शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

महासंचालक घेणार बदलीचा निर्णय

By admin | Updated: January 19, 2017 05:47 IST

पोलिसांच्या आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल तीन महिन्यांपासून गृह विभागात प्रलंबित आहे

जमीर काझी,

मुंबई- राज्य पोलीस दलामध्ये २०११नंतर भरती झालेल्या पोलिसांच्या आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल तीन महिन्यांपासून गृह विभागात प्रलंबित आहे. त्यामुळे आता पोलीस महासंचालकांकडून त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळेपर्यंत पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्यांच्या जवळच्या गंभीर आजारी असलेल्या नातेवाइकांसाठी निर्णय घेतला जाणार आहे. त्यासंबंधीचे अर्ज १५ फेबु्रवारीपर्यंत पाठविण्याचे आदेश महासंचालक माथूर यांनी पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.पोलिसांची आंतरजिल्हा बदली न करण्याची अट रद्द करावी, असा प्रस्ताव २८ आॅक्टोबरला गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय न होता फाइल पडून राहिल्याबाबतचे वृत ‘लोकमत’ने १० डिसेंबरला दिले होते. समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर राबणाऱ्या व खात्याचा कणा असलेल्या पोलिसांची २०११ नंतरच्या भरतीदरम्यान ज्या पोलीस घटकात नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्यत्र आंतरजिल्हा बदली करावयाची नाही, असा धोरणात्मक नियम सरकारने घेतला. मात्र, नोकरीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून, विशेषत: ग्रामीण व मागास भागातून भरतीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आलेल्या कर्मचाऱ्यांचे गावाकडील वृद्ध पालक, तेथील अन्य समस्या प्रकर्षाने भेडसावू लागल्या. तसेच अनेक पुरुष किंवा महिला पोलिसांचे जोडीदार अन्य जिल्ह्यांमध्ये नोकरीला आहेत. त्यांना स्वतंत्र राहावे लागत असल्याने त्याचा मानसिक परिणाम पोलिसांच्या कामावर होत आहे. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने पोलीस महासंचालकांनी ही अट रद्द करून त्यांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रहित धरले जावे, याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला आहे. अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तो अद्यापही पोल-५(ब)कडे प्रलंबित आहे. त्यामुळे सुधारित सेवानियमाबाबत निर्णय होईपर्यंत पती-पत्नी एकत्रीकरण व कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाइकांना गंभीर आजार असल्यास संबंधितांची इच्छुक ठिकाणी बदली महासंचालकांकडून करण्यात येईल. त्यासाठी २०११ पूर्वी भरती झालेल्यांना लागू असलेल्या नियमाप्रमाणे भरती झालेल्या ठिकाणी किमान ५ वर्षे सेवा झालेली असणे अनिवार्य आहे. >आचारसंहितेमुळे दीड महिना विलंब होणारसध्या राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आचारसंहितेमुळे त्याबाबतचा निर्णय किमान दीड महिना होणार नाही. तोपर्यंत अत्यावश्यक निकड असणाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.>गृह विभागाकडे यासंबंधी पाठविण्यात आलेल्या सेवा नियमाच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळेपर्यंत केवळ गरजूंची आवश्यकता व त्यासंबंधीच्या पुराव्यानिशी बदल्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यासंबंधी संबंधित घटकप्रमुखाचा अभिप्राय महत्त्वाचा असेल. - सतीश माथूर, पोलीस महासंचालक)