शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

राज्यात देवेंद्र राजवटच

By admin | Updated: November 14, 2014 02:03 IST

विधानसभा विसर्जित करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तडकाफडकी फेटाळली.

मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिकारावर आलेले सरकार भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेले नसल्याने ते सरकार हटवावे आणि विधानसभा विसर्जित करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तडकाफडकी फेटाळली.
भारिप बहुजन महासंघाने ही याचिका केली होती. ‘तुमची याचिका ऐकण्याची आमची इच्छा नाही,’ असे न्या. विद्यासगर कानडे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने याचिकाकत्र्याचे वकील व नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सांगितले.
राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेची स्थापना बेकायदेशीरपणो झालेली असल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. याचा खुलासा करताना अॅड. आंबेडकर म्हणाले, सध्याची विधानसभा तीन दिवसांच्या विलंबाने गठित करण्यात आली आहे. या विलंबामुळे मंत्री परिषदेची स्थापना वैध ठरते का, हा मुख्य मुद्दा आहे. तसे नसेल तर मंत्री परिषद अस्तित्वात येणो व त्यानंतरचे सर्वच असंवैधानिक ठरते.
आधीची विधानसभा, विहित मुदत संपल्याने 8 नोव्हेंबर रोजी विसर्जित केली गेली व नवी विधानसभा त्यानंतर तिस:या दिवशी म्हणजे 1क् नोव्हेंबर रोजी गठित झाली, याकडे याचिकेत लक्ष वेधले गेले होते.
यावर, विलंबाने गठित झालेली विधानसभा मुळातच अवैध ठरते व परिणामी ती आपसूक विसर्जित होते, अशी राज्यघटनेत तरतूद असल्यास ती सांगावी, असे न्यायालयाने अॅड. आंबेडकर यांना सांगितले.
यावर अॅड. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164(2) व अनुच्छेद 168 यांचा संदर्भ दिल्यावर न्यायालयाने विचारले, ‘यामुळे नवी विधानसभा विसर्जित कशी काय होते? नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. दोन विधानसभांच्या कार्यकाळात दोन दिवसांचे अंतर राहिल्याने काय फरक पडतो?’
न्यायालयाने असेही स्पष्ट केले, विधानसभा गठित करण्यास विलंब झाल्याने संवैधानिक व्यवस्था मोडून पडते व परिणामी नव्याने अस्तित्वात आलेली विधानसभा आपोपाप विसर्जित होते, अशी राज्यघटनेत सुस्पष्ट तरतूद असल्याखेरीज या प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही. अशी कोणतीही तरतूद राज्यघटनेत नाही, हे स्पष्ट असल्याने याचिकेवर विचार करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, असे खंडपीठाने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 
च्न्यायालयाने विचारलेल्या नेमक्या प्रश्नाच्या उत्तरात अॅड. आंबेडकर यांनी दिलेला राज्यघटनेच्या अनुच्छेद 164(2) व अनुच्छेद 168 यांचा संदर्भ कसा तद्दन गैरलागू होता हे समजण्यासाठी या दोन्ही अनुच्छेदांमध्ये नेमके काय म्हटले आहे ते पाहणो उद्बोधक ठरेल.
 
च्अनुच्छेद 168- संघराज्यातील प्रत्येक घटक राज्याला राज्यपाल आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी सभागृह यांचा समावेश असलेले स्वतंत्र विधानमंडळ असेल. महाराष्ट्र, बिहार यांसह काही राज्यांमध्ये विधिमंडळ दोन सभागृहांचे असेल. अशा ठिकाणी एक सभागृह विधानसभा तर दुसरे विधान परिषद म्हणून ओळखले जाईल.