शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

राज्यात देवेंद्र राजवटच

By admin | Updated: November 14, 2014 02:03 IST

विधानसभा विसर्जित करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तडकाफडकी फेटाळली.

मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिकारावर आलेले सरकार भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेले नसल्याने ते सरकार हटवावे आणि विधानसभा विसर्जित करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तडकाफडकी फेटाळली.
भारिप बहुजन महासंघाने ही याचिका केली होती. ‘तुमची याचिका ऐकण्याची आमची इच्छा नाही,’ असे न्या. विद्यासगर कानडे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने याचिकाकत्र्याचे वकील व नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सांगितले.
राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेची स्थापना बेकायदेशीरपणो झालेली असल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. याचा खुलासा करताना अॅड. आंबेडकर म्हणाले, सध्याची विधानसभा तीन दिवसांच्या विलंबाने गठित करण्यात आली आहे. या विलंबामुळे मंत्री परिषदेची स्थापना वैध ठरते का, हा मुख्य मुद्दा आहे. तसे नसेल तर मंत्री परिषद अस्तित्वात येणो व त्यानंतरचे सर्वच असंवैधानिक ठरते.
आधीची विधानसभा, विहित मुदत संपल्याने 8 नोव्हेंबर रोजी विसर्जित केली गेली व नवी विधानसभा त्यानंतर तिस:या दिवशी म्हणजे 1क् नोव्हेंबर रोजी गठित झाली, याकडे याचिकेत लक्ष वेधले गेले होते.
यावर, विलंबाने गठित झालेली विधानसभा मुळातच अवैध ठरते व परिणामी ती आपसूक विसर्जित होते, अशी राज्यघटनेत तरतूद असल्यास ती सांगावी, असे न्यायालयाने अॅड. आंबेडकर यांना सांगितले.
यावर अॅड. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164(2) व अनुच्छेद 168 यांचा संदर्भ दिल्यावर न्यायालयाने विचारले, ‘यामुळे नवी विधानसभा विसर्जित कशी काय होते? नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. दोन विधानसभांच्या कार्यकाळात दोन दिवसांचे अंतर राहिल्याने काय फरक पडतो?’
न्यायालयाने असेही स्पष्ट केले, विधानसभा गठित करण्यास विलंब झाल्याने संवैधानिक व्यवस्था मोडून पडते व परिणामी नव्याने अस्तित्वात आलेली विधानसभा आपोपाप विसर्जित होते, अशी राज्यघटनेत सुस्पष्ट तरतूद असल्याखेरीज या प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही. अशी कोणतीही तरतूद राज्यघटनेत नाही, हे स्पष्ट असल्याने याचिकेवर विचार करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, असे खंडपीठाने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 
च्न्यायालयाने विचारलेल्या नेमक्या प्रश्नाच्या उत्तरात अॅड. आंबेडकर यांनी दिलेला राज्यघटनेच्या अनुच्छेद 164(2) व अनुच्छेद 168 यांचा संदर्भ कसा तद्दन गैरलागू होता हे समजण्यासाठी या दोन्ही अनुच्छेदांमध्ये नेमके काय म्हटले आहे ते पाहणो उद्बोधक ठरेल.
 
च्अनुच्छेद 168- संघराज्यातील प्रत्येक घटक राज्याला राज्यपाल आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी सभागृह यांचा समावेश असलेले स्वतंत्र विधानमंडळ असेल. महाराष्ट्र, बिहार यांसह काही राज्यांमध्ये विधिमंडळ दोन सभागृहांचे असेल. अशा ठिकाणी एक सभागृह विधानसभा तर दुसरे विधान परिषद म्हणून ओळखले जाईल.