शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस नागपूरचे मुख्यमंत्री !

By admin | Updated: August 27, 2015 01:56 IST

महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला अजून स्वत:चा प्रभाव पाडता आला आहे काय?मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही ‘शाश्वत’ विकास करू, असे अवघड

लातूर : महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला अजून स्वत:चा प्रभाव पाडता आला आहे काय?मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही ‘शाश्वत’ विकास करू, असे अवघड शब्द वापरून फसवणूक करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दर शनिवारी-रविवारी नागपूर दौरा करणारे फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे, तर फक्त नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त येथे आलेल्या राणे यांनी, मी मुख्यमंत्री होतो. मला त्या पदाची ताकत माहीत आहे, परंतु विद्यमान मुख्यमंत्र्याला माहिती नाही. ते बोलण्यात माहीर आहेत. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी हे सरकारचे डोळे आहेत. परंतु अर्ज करूनही प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही. १० महिन्यांत सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. सरकारकडे डोळसपणा लागतो, असे सांगितले. आठ दिवसांत सरकारने मदत केली नाही तर काँग्रेस व राणे शेतकऱ्यांना मदत करतील, असे त्यांनी सांगितले. निवडणुका पाहून बिहारला मदत करताना मराठवाड्यातील दुष्काळ कसा दिसत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.पाटलांनी बोध घ्यावा !गुजरातमध्ये पटेल समाज आरक्षणासाठी एकजुटीने पेटून उठला आहे़ महाराष्ट्रातील पाटलांनी (मराठा समाज) गुजरातच्या एकजुटीचा बोध घेऊन आरक्षणासाठी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले.