शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आपत्तीवरील खर्चाने विकास मंदावला

By admin | Updated: August 11, 2014 03:38 IST

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला

शिर्डी : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला असला, तरी उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरच असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पणन मंडळामार्फत खडकेवाके येथे उभारलेल्या राज्यातील पहिल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले़ गेल्या तीन चार वर्षांत राज्य सरकारने आपत्ती निवारणासाठी दहा-बारा हजार कोटी रुपये खर्च केले़ गारपिटीत शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली. विशेष म्हणजे यातील ९० टक्के रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली़़ नैसर्गिक आपत्तीत एवढ्या तातडीने देशात कोणतेही राज्य मदत करु शकलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उन्हाळ्यात जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याने विकास योजनांना कात्री लावावी लागली. पावसाच्या अनियमिततेवर उपाययोजना म्हणून मोठ्या प्रकल्पांबरोबरच भूजल पातळी वाढण्याकरिता गावोगावी शेततळी, ओढ्यांवर साखळी बंधारे बांधावे लागतील़, असे चव्हाण म्हणाले. राज्यातील वस्त्रोद्योगात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहा लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी व पणन विभाग एकत्र करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत आहेत. अ‍ॅग्रोपार्कच्या माध्यमातून विकासाचे नवे दालन खुले झाल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)