शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा पुन्हा लटकणार!

By admin | Updated: November 5, 2014 23:44 IST

इस्लामपूर नगरपालिका : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अशोक पाटील -इस्लामपूर --१९८0 नंतर इस्लामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारित झालेली उपनगरे पाहता, नियोजित विकास आराखडा अद्यापही शासनदरबारी अंतिम टप्प्यात आहे. परंतु सध्या राज्यात भाजपचे सरकार आल्याने अन्यायी विकास आराखडा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. ३४ वर्षे होऊनही १९८0 चा विकास आराखडा आजही इस्लामपूर शहराला लागू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीने अद्यापही नवीन विकास आराखडा अंमलात आणलेला नाही. ८0 मधील ४0 आरक्षणांपैकी २0 आरक्षणे पालिकेने विकसित केली आहेत. यामध्ये केवळ शासकीय जागांचा समावेश आहे. त्यानंतर २00४ मध्ये नवीन विकास आराखडा करण्यात आला. या आराखड्यात १८0 आरक्षणे टाकण्यात आली होती. परंतु यामध्ये सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय झाला होता. त्यामुळे जनतेतूनच याला मोठा विरोध झाला. यामुळे सत्ताधाऱ्यांनी हा आराखडा रद्द केला. २0११ मध्ये नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्येही १६३ आरक्षणे टाकण्यात आली होती. हा आराखडा शासकीय दरबारी अनेकवेळा जाऊनही काही ना काही त्रुटी निघतच गेल्या. त्यामुळे तो आजही शासनदरबारी मंजुरीसाठी पडून आहे. याही आराखड्यात नगरपालिकेतील विरोधी गट आणि सर्वसामान्यांना सत्ताधारी वेठीस धरत आहेत, असा आरोप भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केला आहे. म्हणूनच हाही आराखडा रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.इस्लामपूर पालिकेवर माजी मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी १५ वर्षे अर्थखाते सांभाळले होते. याच ताकदीवर त्यांनी इस्लामपूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. शहराचा चेहरा—मोहरा बदलण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाटील यांनी युध्दपातळीवर प्रयत्न केले. यातून काही आंतरराष्ट्रीय दर्जाची कामेही झाली. परंतु पालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करुन शहरात बेकायदेशीर व निकृष्ट कामे केल्याने शहराचा विकास होण्याऐवजी ते भकासच होत गेल्याचे चित्र आहे.गुंठेवारीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. इस्लामपूर पालिकेत ज्यांचे वजन आहे, त्यांनीच बेकायदेशीर गुंठेवारी कायदेशीर करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची शासनदरबारी दादही घेतली गेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोट्यवधी रुपयांना मुकले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून शहरातील अन्यायी विकास आराखडा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाच्या भूमिकेकडे लक्षनियोजित विकास आराखडा अद्यापही शासनदरबारी अंतिम टप्प्यात आहे. परंतु सध्या राज्यात भाजपचे सरकार आल्याने अन्यायी विकास आराखडा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचा भाजपच्या नेत्यांनी इशारा दिला आहे. या निर्णयावर राज्य शासन काय भूमिका घेणार याकडे नगरपालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.२0११ मध्ये नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्येही १६३ आरक्षणे टाकण्यात आली होती. हा आराखडा शासकीय दरबारी त्रुटींमुळे धूळ खात पडून असल्याने नागरिक नाराज आहेत.