शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

विकास आराखडा निधीअभावी जाणार वाहून

By admin | Updated: June 13, 2015 02:23 IST

मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन

बिर्लागेट : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केली होती. यानंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठविला. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने तो यंदाच्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार, असे वाटते.मलंगगडावरून उगम पावणारी वालधुनी नदी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनदायिनी ठरली होती. याच नदीवर इंग्रजांनी कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करणारा जीआयपी टँक बांधला होता. मात्र, काळानुरूप परिस्थिती बदलली. अंबरनाथमध्ये औद्योगिकीकरण झाले. नदीच्या काठांवर कारखाने झाले. त्यानंतर, उल्हासनगरातील जीन्स उद्योगांतून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याची भर पडली.प्लॅस्टिक घनकचरा जमा होऊन नदीचा नाला कधी झाला, हे कळलेच नाही. त्यातच काठांवरील अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ बनल्याने २००५ च्या अतिवृष्टीत सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराबाई रेणुका सोसायटी, शहाड फाटक आदी ठिकाणी झोपडपट्टीत पाणी घुसले होते. त्यामुळे या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या घोषणेनंतर आयुक्त सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०११ मध्ये सरकारकडे पाठविला. यावर सरकारने समितीही नेमली. या समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बैठकाच होतात. निष्पन्न काहीच होत नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील २८ नद्यांच्या यादीत सगळ्यात जास्त प्रदूषित नदी वालधुनीच असल्याचे म्हटले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून ९ हजार २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी काही निधी वालुधनी नदी विकासासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्यातरी हा विकास आराखडा निधीअभावी पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असेच दिसते. (वार्ताहर)