शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विकास आराखडा निधीअभावी जाणार वाहून

By admin | Updated: June 13, 2015 02:23 IST

मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन

बिर्लागेट : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केली होती. यानंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठविला. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने तो यंदाच्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार, असे वाटते.मलंगगडावरून उगम पावणारी वालधुनी नदी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनदायिनी ठरली होती. याच नदीवर इंग्रजांनी कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करणारा जीआयपी टँक बांधला होता. मात्र, काळानुरूप परिस्थिती बदलली. अंबरनाथमध्ये औद्योगिकीकरण झाले. नदीच्या काठांवर कारखाने झाले. त्यानंतर, उल्हासनगरातील जीन्स उद्योगांतून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याची भर पडली.प्लॅस्टिक घनकचरा जमा होऊन नदीचा नाला कधी झाला, हे कळलेच नाही. त्यातच काठांवरील अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ बनल्याने २००५ च्या अतिवृष्टीत सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराबाई रेणुका सोसायटी, शहाड फाटक आदी ठिकाणी झोपडपट्टीत पाणी घुसले होते. त्यामुळे या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या घोषणेनंतर आयुक्त सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०११ मध्ये सरकारकडे पाठविला. यावर सरकारने समितीही नेमली. या समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बैठकाच होतात. निष्पन्न काहीच होत नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील २८ नद्यांच्या यादीत सगळ्यात जास्त प्रदूषित नदी वालधुनीच असल्याचे म्हटले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून ९ हजार २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी काही निधी वालुधनी नदी विकासासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्यातरी हा विकास आराखडा निधीअभावी पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असेच दिसते. (वार्ताहर)