शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

विकास आराखडा निधीअभावी जाणार वाहून

By admin | Updated: June 13, 2015 02:23 IST

मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन

बिर्लागेट : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केली होती. यानंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठविला. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने तो यंदाच्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार, असे वाटते.मलंगगडावरून उगम पावणारी वालधुनी नदी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनदायिनी ठरली होती. याच नदीवर इंग्रजांनी कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करणारा जीआयपी टँक बांधला होता. मात्र, काळानुरूप परिस्थिती बदलली. अंबरनाथमध्ये औद्योगिकीकरण झाले. नदीच्या काठांवर कारखाने झाले. त्यानंतर, उल्हासनगरातील जीन्स उद्योगांतून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याची भर पडली.प्लॅस्टिक घनकचरा जमा होऊन नदीचा नाला कधी झाला, हे कळलेच नाही. त्यातच काठांवरील अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ बनल्याने २००५ च्या अतिवृष्टीत सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराबाई रेणुका सोसायटी, शहाड फाटक आदी ठिकाणी झोपडपट्टीत पाणी घुसले होते. त्यामुळे या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या घोषणेनंतर आयुक्त सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०११ मध्ये सरकारकडे पाठविला. यावर सरकारने समितीही नेमली. या समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बैठकाच होतात. निष्पन्न काहीच होत नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील २८ नद्यांच्या यादीत सगळ्यात जास्त प्रदूषित नदी वालधुनीच असल्याचे म्हटले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून ९ हजार २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी काही निधी वालुधनी नदी विकासासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्यातरी हा विकास आराखडा निधीअभावी पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असेच दिसते. (वार्ताहर)