शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

मुंबई विद्यापीठाला विकास ‘लकवा’

By admin | Updated: April 13, 2015 05:36 IST

मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला नसल्याने विद्यापीठाला विकास लकवा झाला आहे की काय, अशी टीका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होत आहे.विद्यापीठाने २0१३-१४ या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी कित्येक कोटींची तरतूद केली होती. मात्र, तरतूद केलेला निधीतील एक रुपयाही आजवर वापरण्यात आला नसल्याने विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे उपकेंद्रासाठी ४ कोटींची तरतूद झाली. मात्र, त्यामधील निधी पूर्ण वापरलेला नाही. विद्यानगरीतील विविध बांधकामांसाठी २८ कोटी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यामधील १0 कोटींचा खर्च झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रेसमधील मशनरीसाठी २0 लाखांची मात्र त्यामधील एकही रुपया खर्च झाला नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा कारभार कुर्मगतीने सुरु असल्याचे दिसत आहे.कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीचे कामही ठप्प झाले आहे. प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल न दिल्याने त्याने सुरक्षा भिंतीचे काम थांबवले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका विद्यापीठाच्या विकासाला बसत आहे. विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूद करते. परंतु तो निधी वापरात येत नसल्याने विद्यापीठाचे नुकसान होत असल्याचे, सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)