शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांसद आदर्श ग्राम योजनेतील गावांचा विकास रखडलेला. साडेचार वर्षांत केवळ १८ टक्के कामे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: January 4, 2024 13:09 IST

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली.

मुंबई : सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गावांचा विकास रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. या गावांत मागील साडेचार वर्षात केवळ १८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. 

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात पहिला टप्पा राबवण्यात आला, तर २०१९ ते २०२४ हा योजनेचा दुसरा टप्पा आहे. लोकसभेच्या प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील दरवर्षी एक याप्रमाणे ५ गावे निवडून २०२४ पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित करायचे आहे. 

-या योजनेसाठी केंद्र सरकारचा स्वतंत्र निधी नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध योजनांचा निधी, खासदार निधी आणि सीएसआर फंड दिला जातो.

अंमलबजावणीसाठी समिती, पण पाठपुरावाच नाहीया योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष कार्यरत आहे. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती असून ग्रामविकास विभागाचे सचिव याचे सदस्य सचिव आहेत. तर जिल्हाधिकारी जिल्हा नोडल अधिकारी आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सह समन्वयक अधिकारी आहेत. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हे संपर्क अधिकारी आहेत. खासदारांनी पुरेसा पाठपुरावा न केल्याने ही योजना रखडल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Governmentसरकार