शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

सांसद आदर्श ग्राम योजनेतील गावांचा विकास रखडलेला. साडेचार वर्षांत केवळ १८ टक्के कामे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: January 4, 2024 13:09 IST

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली.

मुंबई : सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गावांचा विकास रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. या गावांत मागील साडेचार वर्षात केवळ १८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. 

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात पहिला टप्पा राबवण्यात आला, तर २०१९ ते २०२४ हा योजनेचा दुसरा टप्पा आहे. लोकसभेच्या प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील दरवर्षी एक याप्रमाणे ५ गावे निवडून २०२४ पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित करायचे आहे. 

-या योजनेसाठी केंद्र सरकारचा स्वतंत्र निधी नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध योजनांचा निधी, खासदार निधी आणि सीएसआर फंड दिला जातो.

अंमलबजावणीसाठी समिती, पण पाठपुरावाच नाहीया योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष कार्यरत आहे. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती असून ग्रामविकास विभागाचे सचिव याचे सदस्य सचिव आहेत. तर जिल्हाधिकारी जिल्हा नोडल अधिकारी आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सह समन्वयक अधिकारी आहेत. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हे संपर्क अधिकारी आहेत. खासदारांनी पुरेसा पाठपुरावा न केल्याने ही योजना रखडल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Governmentसरकार