शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

सांसद आदर्श ग्राम योजनेतील गावांचा विकास रखडलेला. साडेचार वर्षांत केवळ १८ टक्के कामे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: January 4, 2024 13:09 IST

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली.

मुंबई : सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गावांचा विकास रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. या गावांत मागील साडेचार वर्षात केवळ १८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. 

गावांचा परिपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात पहिला टप्पा राबवण्यात आला, तर २०१९ ते २०२४ हा योजनेचा दुसरा टप्पा आहे. लोकसभेच्या प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील दरवर्षी एक याप्रमाणे ५ गावे निवडून २०२४ पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित करायचे आहे. 

-या योजनेसाठी केंद्र सरकारचा स्वतंत्र निधी नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध योजनांचा निधी, खासदार निधी आणि सीएसआर फंड दिला जातो.

अंमलबजावणीसाठी समिती, पण पाठपुरावाच नाहीया योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष कार्यरत आहे. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती असून ग्रामविकास विभागाचे सचिव याचे सदस्य सचिव आहेत. तर जिल्हाधिकारी जिल्हा नोडल अधिकारी आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सह समन्वयक अधिकारी आहेत. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हे संपर्क अधिकारी आहेत. खासदारांनी पुरेसा पाठपुरावा न केल्याने ही योजना रखडल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Governmentसरकार