शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुंबईलगतच्या समुद्रातील बेटांचा विकास करणार

By admin | Updated: January 23, 2016 03:12 IST

कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करून ते एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास कोकणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा खोवला जाईल.

अलिबाग : कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करून ते एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास कोकणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा खोवला जाईल. पर्यटनवाढीसाठी मुंबईलगतची समुद्रातील बेटे विकसित करण्याचा विचार आहे. या बेटांचा विकास केल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले आहे.थळ-अलिबागजवळच्या समुद्रातील ऐतिहासिक खांदेरी या बेटाचे कान्होजी आंग्रे बेट असे नामकरण करण्यात आले. या कान्होजी आंग्रे बेटावर प्रवासी जेट्टी उभारण्याच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाने देशातील दीपगृह (लाइट हाऊस) असलेली बेटे विकसित करण्याचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील कान्होजी आंग्रे बेटावरील विकासाचा हा समारंभ या योजनेचा शुभारंभ आहे. मुंबईलगतची बेटे विकसित केल्यास पर्यटनवाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढल्याने त्या ठिकाणची सुरक्षितताही राखली जाते. तसेच येथे अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे सीसीटीव्ही लावण्यात येतील. सन २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यामध्ये कान्होजी आंग्रे बेट हे पर्यटनस्थळ म्हणून त्यात समाविष्ट व्हावे, अशा दृष्टीने या बेटाच्या विकासाचे काम करावे. जलवाहतुकीमुळे वेळेची आणि इंधनाचीही बचत होते. त्यामुळे जलवाहतुकीसाठी तसेच वेस्टन फ्रंटलाइन जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. जलवाहतूक आणि पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून राज्याचे नवे बंदर धोरण लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दीपगृह बेटांचा (लाइट हाऊस) विकास करण्याच्या केंद्राच्या धोरणानुसार कान्होजी आंग्रे या बेटावर पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी येथे प्रवासी जेटी सुरू करण्यात येणार आहे. या बेटाच्या विकासात पर्यटकांना राहण्यासाठी रिसॉर्ट, कॉटेज उभारण्यात येणार असल्याचे नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)