शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

विकासाचे भाकीत सोपे, अंमलबजावणी अवघड

By admin | Updated: February 15, 2016 04:09 IST

देशाच्या आर्थिक विकासात आव्हाने आहेत, परंतु त्याने सरकार खचून जाणार नाही. आर्थिक सुधारणांना बळकटी देण्यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला जात आहे.

मुंबई : देशाच्या आर्थिक विकासात आव्हाने आहेत, परंतु त्याने सरकार खचून जाणार नाही. आर्थिक सुधारणांना बळकटी देण्यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला जात आहे. ‘प्रत्यक्ष कर सुधारणा’ आणि ‘अप्रत्यक्ष कर सुधारणा’ या दोन्ही गोष्टींसाठीची सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. आर्थिक क्षेत्राच्या विकासाबाबत भाकीत करणे सोपे असते. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे कठीण असते. त्यामुळे केंद्र सरकारचा पायाभूत सेवासुविधा बळकट करण्यावर भर आहे. देशाचा आर्थिक विकास साधताना, रस्ते, विमानतळ आणि रेल्वेसह अन्य क्षेत्रही केंद्रस्थानी आहेत, असे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया’च्या सेंटर एक्स्पोला अरुण जेटली यांनी रविवारी सकाळी भेट दिली. ‘मेक इन इंडिया’चा भाग म्हणून आशिया बिझनेस फोरममध्येही जेटली सहभागी झाले. या वेळी दिलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. मुलाखतीत त्यांनी बॅकिंग, कृषी आणि उद्योग आदी विषयांवर मते मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आर्थिक घडामोडींच्या केंद्रस्थानी यावा, म्हणून अधिकाधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मेक इन इंडिया’च्या उद्घाटनाच्या वेळी दिले होते. त्यातच आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही केंद्र सरकार लवकरच काही बँकिंग सुधारणांवर भर देणार असल्याची घोषणा या वेळी केली. ते म्हणाले की, ‘मागील तीन दशकांपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. या पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेही आर्थिक क्षेत्रासाठी मोलाचे योगदान दिले आहे, परंतु असे असले, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत आल्यापासून, आर्थिक विकासाचे दुसरे पर्व सुरू झाल्याचे जेटली यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)मनमोहन सिंग यांच्यावरही केली टीकाकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग हे जेव्हा देशाचे केंद्रीय अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी देशात आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, जेव्हा ते पंतप्रधान झाले, तेव्हा देशातील आर्थिक सुधारणांना बळकटी मिळण्याऐवजी त्यांचा बट्ट्याबोळ झाला, अशी घणाघाती टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.