शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी समाजाचे विकासातील योगदान उल्लेखनीय- राज्यपाल

By admin | Updated: April 25, 2016 05:49 IST

नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली

मुंबई : देशाच्या फाळणीमध्ये सर्वस्व गमावूनदेखील महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली, तसेच राज्याच्या व देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान दिले, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी काढले.भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या मुलुंड येथील गुरु गोविंद सिंह महापालिका मैदानावर आयोजित केलेल्या ‘चेती चाँद मेला’ या सिंधी नववर्ष सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. सिंधी बांधवांनी मुंबईत निर्माण केलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, असे सांगत सिंधी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी गुजरात येथील ‘इन्स्टिट्युट आॅफ सिंधोलॉजी’प्रमाणे मुंबईतदेखील एक उच्चशिक्षण संस्था निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. कुलपती या नात्याने अशी संस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.भारतीय सिंधू सभेने गैर सिंधी भाषिक विद्यार्थ्यांना सिंधी भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली. सिंधी समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार सरदार तारासिंह, अखिल भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लक्ष्मण चांदिरामाणी, कार्याध्यक्ष लधाराम नागवाणी, महासचिव राधाकृष्ण भगिया, महोत्सवाचे सचिव किशोर असवाणी व अनेक सिंधी बांधव उपस्थित होते.