शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कृषी विमा उत्पादने विकसित करा

By admin | Updated: August 27, 2015 03:07 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद

उपराष्ट्रपतींचे आवाहन : विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावामुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी विमा कंपन्यांना केले. इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि पुढील हंगामापर्यंत त्यांचा पतदर्जा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे. भारतातील कृषी क्षेत्राला दुष्काळ, पूर, पिकाला कीड लागणे आणि पिकांना लागणारे रोग यांचा धोका असतो. पर्जन्यमान मोजमापाच्या अद्ययावत सुविधेच्या मदतीने पर्जन्यमान विमा योजना तयार करून या समस्यांवर काही प्रमाणात मात करता येईल. सार्वजनिक आणि खासगी विमा कंपन्या पर्जन्यमान विमा उत्पादनांसंदर्भातील शक्यता पडताळून पाहात आहेत आणि त्यांच्या प्रतिसाद प्रोत्साहन वाढविणारा आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले. विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. २०१२-१३ या वर्षासाठी विम्यातून मिळणाऱ्या प्रीमिअमचे प्रमाण जीडीपीच्या ३.९६ टक्के एवढे होते. जगभरात हेच प्रमाण सरासरी ६.३ टक्के एवढे होते, असेही त्यांनी नमूद केले. दक्षिण आफ्रिकेतील अभिनव प्रयोगरवांडा, घाना, सेनेगल इत्यादी आफ्रिकन देशांमध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक पिकविम्यापेक्षा वातावरणावर आधारित विमा कमी प्रिमीअमध्ये देण्यात येतो. भारतात विम्याचा प्रसार करण्यासाठी या मॉडेलमध्ये भारताच्या दृष्टीने सुधारणा करून ती वापरता येऊ शकतात, असेही अन्सारी म्हणाले.