शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सबनीसांकडून साहित्याच्या व्यासपीठाचे अवमूल्यन

By admin | Updated: January 10, 2016 00:59 IST

प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक

पुणे : प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक असते; पण श्रीपाल सबनीस यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पदाचा गैरवापर केला, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य करून साहित्य व्यासपीठाचे अवमूल्यन केले असल्याचे ते म्हणाले.संमेलनाध्यक्षांनी राजकारणावर बोलू नये, असे अजिबात नाही. दुर्गा भागवत यांनी आणीबाणीबाबत, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्याबाबत साहित्याच्या व्यासपीठावरून लढा उभारण्याचे आवाहन केले होते; पण कसे बोलावे हे समजले पाहिजे. साहित्य क्षेत्राला एक प्रतिष्ठा, मोठेपणा आहे. तो अध्यक्षांना सांभाळता आला पाहिजे, तो वाढविता आला पाहिजे, असे भंडारी म्हणाले. (प्रतिनिधी)संमेलनाच्या उद्घाटनासाठी आणि समारोपासाठी भाजपाचे मोठे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे येणार का, याबाबत भंडारी म्हणाले, संमेलनाच्या निमंत्रणामध्ये निमंत्रित म्हणून त्यांची नावे टाकण्यात आली आहेत; पण ते येतील का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी अजून आठवडा आहे. ‘निमंत्रित म्हणून नाव टाकले म्हणजे, येतीलच असे नाही’ असे सूचक विधानही त्यांनी केले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना साहित्य संमेलनाला शासनाकडून २५ लाख एवढी मोठी रक्कम देणे योग्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, अशी माहिती भंडारी यांनी दिली.