शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

सबनीसांकडून साहित्याच्या व्यासपीठाचे अवमूल्यन

By admin | Updated: January 10, 2016 00:59 IST

प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक

पुणे : प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक असते; पण श्रीपाल सबनीस यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पदाचा गैरवापर केला, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य करून साहित्य व्यासपीठाचे अवमूल्यन केले असल्याचे ते म्हणाले.संमेलनाध्यक्षांनी राजकारणावर बोलू नये, असे अजिबात नाही. दुर्गा भागवत यांनी आणीबाणीबाबत, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्याबाबत साहित्याच्या व्यासपीठावरून लढा उभारण्याचे आवाहन केले होते; पण कसे बोलावे हे समजले पाहिजे. साहित्य क्षेत्राला एक प्रतिष्ठा, मोठेपणा आहे. तो अध्यक्षांना सांभाळता आला पाहिजे, तो वाढविता आला पाहिजे, असे भंडारी म्हणाले. (प्रतिनिधी)संमेलनाच्या उद्घाटनासाठी आणि समारोपासाठी भाजपाचे मोठे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे येणार का, याबाबत भंडारी म्हणाले, संमेलनाच्या निमंत्रणामध्ये निमंत्रित म्हणून त्यांची नावे टाकण्यात आली आहेत; पण ते येतील का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी अजून आठवडा आहे. ‘निमंत्रित म्हणून नाव टाकले म्हणजे, येतीलच असे नाही’ असे सूचक विधानही त्यांनी केले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना साहित्य संमेलनाला शासनाकडून २५ लाख एवढी मोठी रक्कम देणे योग्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, अशी माहिती भंडारी यांनी दिली.