शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सबनीसांकडून साहित्याच्या व्यासपीठाचे अवमूल्यन

By admin | Updated: January 10, 2016 00:59 IST

प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक

पुणे : प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक असते; पण श्रीपाल सबनीस यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पदाचा गैरवापर केला, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य करून साहित्य व्यासपीठाचे अवमूल्यन केले असल्याचे ते म्हणाले.संमेलनाध्यक्षांनी राजकारणावर बोलू नये, असे अजिबात नाही. दुर्गा भागवत यांनी आणीबाणीबाबत, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्याबाबत साहित्याच्या व्यासपीठावरून लढा उभारण्याचे आवाहन केले होते; पण कसे बोलावे हे समजले पाहिजे. साहित्य क्षेत्राला एक प्रतिष्ठा, मोठेपणा आहे. तो अध्यक्षांना सांभाळता आला पाहिजे, तो वाढविता आला पाहिजे, असे भंडारी म्हणाले. (प्रतिनिधी)संमेलनाच्या उद्घाटनासाठी आणि समारोपासाठी भाजपाचे मोठे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे येणार का, याबाबत भंडारी म्हणाले, संमेलनाच्या निमंत्रणामध्ये निमंत्रित म्हणून त्यांची नावे टाकण्यात आली आहेत; पण ते येतील का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी अजून आठवडा आहे. ‘निमंत्रित म्हणून नाव टाकले म्हणजे, येतीलच असे नाही’ असे सूचक विधानही त्यांनी केले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना साहित्य संमेलनाला शासनाकडून २५ लाख एवढी मोठी रक्कम देणे योग्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, अशी माहिती भंडारी यांनी दिली.