शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

देवदचा पूल धोकादायक

By admin | Updated: October 17, 2016 02:35 IST

गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे.

नवी मुंबई : गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे. १० हजार नागरिकांना या पुलावरून ये - जा करावी लागत आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शासनाने गाढी नदीवर छोटा पूल बांधला आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची रहदारी सुरू आहे. देवद परिसराची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त झाली आहे. येथील नागरिकांना शाळा, मार्केट व इतर कामांसाठी नवीन पनवेलला जावे लागते. रहदारी वाढल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीनेही त्याविषयी ठराव जिल्हा परिषदेकडे दिले आहेत. पण याविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा परिषद, सिडको व शासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय विधानसभेमध्येही आवाज उठविला होता. देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर देवदवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. देवद परिसरामध्ये शाळा, बाजारपेठ नाही, दवाखाने, रिक्षा, बससेवाही नसल्याने प्रत्येक गोष्टीसाठी नवीन पनवेलला जावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाने बांधलेला पूल धोकादायक झाला आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. देवद परिसरात सनातन संस्थेचा आश्रम असल्याने तेथे मोठ्याप्रमाणात भक्तगण येत असतात. पाच वर्षांपासून नवीन पुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. पण आता नैना परिसराकडे या परिसराच्या विकासाची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नाही. दुर्घटना होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>अपघातास जबाबदार कोण? सुकापूर, पाली देवद परिसराचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला हा विभाग आता नैना परिसरात येत आहे. येथे पूल बांधण्याची जबाबदारीही नैनाची म्हणजेच सिडकोची आहे. सिडकोनेही यासाठीचा नकाशाही तयार केला आहे. पण प्रत्यक्षात कार्यवाही जुना पूल कोसळल्यानंतर करणार का, असा प्रश्न आता रहिवासी विचारू लागले आहेत. अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही पूर्णपणे निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनाची असेल, असे मत रहिवासी व्यक्त करू लागले आहेत. >पाठपुरावा१० फेब्रुवारी २०११विचुंबे ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा १७ मार्च २०११उरण विधानसभेचे आमदार विवेक पाटील यांचे जिल्हा परिषदेला पत्र २८ मार्च २०११पूल समितीने जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्यांना पत्र दिले५ एप्रिल २०११आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पुलाचे काम करण्याचे पत्र दिले२० एप्रिल २०११उप अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले पत्र २१ एप्रिल २०११रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी सिडको व्यवस्थापनाकडे आराखडे मागितले. ११ जुलै २०१३सिडकोने देवद पूल समितीला पत्राचे उत्तर दिले. २७ मार्च २०१५देवद पूल समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ३ जुलै २०१५आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आवाज उठविलायाविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा केला आहे.देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.