शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
5
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
6
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
7
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
9
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
10
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
11
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
12
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
13
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
14
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
15
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
16
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
17
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
18
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
19
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
20
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

देवदचा पूल धोकादायक

By admin | Updated: October 17, 2016 02:35 IST

गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे.

नवी मुंबई : गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे. १० हजार नागरिकांना या पुलावरून ये - जा करावी लागत आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शासनाने गाढी नदीवर छोटा पूल बांधला आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची रहदारी सुरू आहे. देवद परिसराची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त झाली आहे. येथील नागरिकांना शाळा, मार्केट व इतर कामांसाठी नवीन पनवेलला जावे लागते. रहदारी वाढल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीनेही त्याविषयी ठराव जिल्हा परिषदेकडे दिले आहेत. पण याविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा परिषद, सिडको व शासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय विधानसभेमध्येही आवाज उठविला होता. देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर देवदवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. देवद परिसरामध्ये शाळा, बाजारपेठ नाही, दवाखाने, रिक्षा, बससेवाही नसल्याने प्रत्येक गोष्टीसाठी नवीन पनवेलला जावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाने बांधलेला पूल धोकादायक झाला आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. देवद परिसरात सनातन संस्थेचा आश्रम असल्याने तेथे मोठ्याप्रमाणात भक्तगण येत असतात. पाच वर्षांपासून नवीन पुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. पण आता नैना परिसराकडे या परिसराच्या विकासाची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नाही. दुर्घटना होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>अपघातास जबाबदार कोण? सुकापूर, पाली देवद परिसराचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला हा विभाग आता नैना परिसरात येत आहे. येथे पूल बांधण्याची जबाबदारीही नैनाची म्हणजेच सिडकोची आहे. सिडकोनेही यासाठीचा नकाशाही तयार केला आहे. पण प्रत्यक्षात कार्यवाही जुना पूल कोसळल्यानंतर करणार का, असा प्रश्न आता रहिवासी विचारू लागले आहेत. अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही पूर्णपणे निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनाची असेल, असे मत रहिवासी व्यक्त करू लागले आहेत. >पाठपुरावा१० फेब्रुवारी २०११विचुंबे ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा १७ मार्च २०११उरण विधानसभेचे आमदार विवेक पाटील यांचे जिल्हा परिषदेला पत्र २८ मार्च २०११पूल समितीने जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्यांना पत्र दिले५ एप्रिल २०११आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पुलाचे काम करण्याचे पत्र दिले२० एप्रिल २०११उप अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले पत्र २१ एप्रिल २०११रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी सिडको व्यवस्थापनाकडे आराखडे मागितले. ११ जुलै २०१३सिडकोने देवद पूल समितीला पत्राचे उत्तर दिले. २७ मार्च २०१५देवद पूल समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ३ जुलै २०१५आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आवाज उठविलायाविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा केला आहे.देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.