शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

संतांविषयी सविस्तर अभ्यासक्रम हवा

By admin | Updated: February 29, 2016 01:19 IST

महाराष्ट्रातील संत आणि राष्ट्रपुरुषांविषयी सविस्तर अभ्यासक्रम सीबीएससी आणि आयसीएससीत असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे सांगितले

व्यथा पाऊणगाववासीयांची : पुनर्वसनाची प्रतीक्षा, जगणे झाले कठीणनिश्चित मेश्राम पालोराउमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाऊणगाव हे गाव पवनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. एकीकडे मरू नदी व गोसे प्रकल्पाच्या ओव्हरफ्लो पाण्याने तुडूंब भरलेली आहे. तर दुसरीकडे गावाला जाण्याकरीता सहा कि़मी. घनदाट जंगलातून जावे लागते. रोजगाराचा शोधात येथील नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहे. या प्रश्नाकडे लक्ष देवून पाऊनगाव वासीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.पवनी तालुक्यात व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र ज्या प्रसंगी गावाचे पुनर्वसन करायचे होते त्या प्रसंगी या गावाला भिवापूर- नागपूर राज्यमार्गावर दाखविण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे गाव वगळण्यात आले. परिणामी या गावातील जनतेला जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे. गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून येथील जनतेनी अनेकदा संबंधित विभागाला निवेदन दिले. मात्र याकडे कुणीही दिले नाही. गावात कोणतेच रोजगार नसल्यामुळे जीवन कसे जगावे, शासनाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहचत नाही. पाऊनगावची जवळपास १,२०० लोकसंख्येचे गाव आहे. मेंढपाळ हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहे. हा गाव उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पात येत असल्यामुळे येथे जनावरांना चराईला बंदी आहे. घनदाट जंगलात हे गाव वसले आहे. जनावरे चराईला बंदी असल्यामुळे गावात कोणतेच रोजगार उरले नाही. या भागात बऱ्याच प्रमाणात नदीकाठावर शेती आहे. मात्र वन्यप्राण्यामुळे पिकाची नासाडी केल्या जाते. पिक रक्षणाकरीता शेतात मचान बांधून पिकाचे रक्षण करावे लागते. वन्यप्राणी नासाडी करतात. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. गावात दररोज वन्यप्राणी येत असतात. वन्य प्राण्यामुळे गावात भुकायला कुत्रेसुद्धा राहिले नाही. वाघोबाचे तर दररोज दर्शन होतात. गावात रोजगार नसल्यामुळे येथील महिला तुटक्या फुटक्या डोंग्यावर बसून नदीतून प्रवास करतात. अनेकदा डोंगे पलटी मारतात वितभर पोटासाठी अनेकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. पवनी येथे जायचे असल्यास घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो.येथे आरोग्य, शिक्षण अशा कोणत्याच सुविधा नाहीत. सदर प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता येथील अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. वनमंत्री आज ना उद्या आमच्या गावाची पाहणी करण्याकरीता येतील हिच अपेक्षा करून आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी व वनमंत्र्यांनी भेट दिली नाही. सायंकाळी ५ वाजेपासूनच हा रस्ता वन्यप्राण्याच्या भितीने बंद होते. गावाच्या ५ कि़मी. वन विभागाची चौकी आहे. समोर पाऊनगाव असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले जात नाही, अशा प्रसंगी वन्य प्राण्याची शिकार करणारी टोळी जावू शकते. याकडे वनविभागासह जिल्हा प्रशासनाने लक्ष दिल्यास पाहुणगाववासीयांची समस्या मार्गी लागू शकते.