शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साठेनगरवासीयांच्या नशिबी नरकयातनाच

By admin | Updated: July 13, 2017 04:26 IST

बीएसयूपी योजनेंतर्गत घरे मिळूनही साठेनगर वसाहतीतील लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही.

प्रशांत माने । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बीएसयूपी योजनेंतर्गत घरे मिळूनही साठेनगर वसाहतीतील लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. दिवाळीच्या आधी त्यांना घरांच्या चाव्या मिळाल्या. मात्र, पाणी आणि विजेच्या सुविधांअभावी ते उंबर्डे येथील बीएसयूपीच्या घरात राहिला जाऊ शकलेले नाहीत. त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष होत असल्याने साठेनगरवासीयांच्या नशिबी ‘नरकयातना’ कायम आहेत. बीएसयूपी योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील कचोरे येथील १३२, कल्याण-इंदिरानगर ५२, डोंबिवली-इंदिरानगर समाधानवाडीत १०७ तसेच साठेनगर (उंबर्डे) येथील ४२ लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या आॅक्टोबरमध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र, घरे मिळूनही साठेनगरवासीय त्या घरांपासून वंचित राहिले आहेत. वीज आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने त्या घरांमध्ये राहायचे तरी कसे, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे त्यांना साठेनगरसारख्या अतिशय अविकसित भागांमध्ये राहणे भाग पडले आहे. आतापर्यंत साठेनगर वसाहतीतील ७० जणांचे बीएसयूपी योजनेंतर्गत पुनर्वसन झाले आहे. परंतु, उंबर्डे येथील इमारतींमध्ये पाणी आणि विजेच्या सुविधांची बोंब असल्याने या सदनिकांकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या असुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याकडे लाभार्थ्यांनी लक्ष वेधले आहे.>स्थानिक नगरसेवकानेही केडीएमसीकडे केला पत्रव्यवहार स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र पाठवून बीएसयूपीतील गैरसुविधा व पुनर्वसितांच्या हालअपेष्टांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांची स्थिती अत्यंत बिकट असून पिण्याचे पाणी, वीज, बसवाहतूक यासारख्या शासनाने सक्ती केलेल्या सेवा परिपूर्ण देण्यास प्रशासन कमी पडत आहे. साठेनगर वसाहतीतील लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी पाटील यांच्याकडून गेल्या महासभेत लक्षवेधीद्वारे केली जाणार होती. परंतु, महापौरांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने पाटील यांच्याकडून लक्षवेधी मांडण्यात आली नाही. याउपरही परिस्थिती कायम राहिल्याने सुविधा देता येत नसेलतर पुनर्वसनाची घाई करता कशाला, असा सवाल पाटील यांनी केला आहे. >वानवा दूर करण्याचे काम सुरु - जोशीसध्या उंबर्डे येथील बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये विजेची आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता भेडसावत आहे. हे वास्तव आहे, परंतु यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. लवकरच या सुविधा लाभार्थ्यांना मिळतील, असा दावा बीएसयूपी प्रकल्प अभियंता सुनील जोशी यांनी दिली. सहा वर्षांपूर्वी विजेच्या सुविधेसाठी ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला होता. परंतु, तो तांत्रिक बिघाड होऊन नादुरुस्त झाला. ‘महावितरण’कडून तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाखांचा खर्च सांगण्यात आला आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. विजेचा प्रश्न सुटल्यावर पाण्याची समस्याही निकाली निघेल, असे जोशी यांनी सांगितले. अन्यथा बेमुदत उपोषण : उंबर्डे येथील बीएसयूपीत प्रशासनाने योग्य प्रकारे सुविधा न दिल्यास बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थी कुटुंबातील गुलाब महादेव जगताप यांनी ‘लोकमत’ला दिली.