शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पाणी पुरवठा, स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करा, आषाढी यात्रा पूर्व तयारी बैठकीत पालकमंत्री देशमुख यांच्या सूचना

By admin | Updated: June 7, 2017 18:33 IST

-

पंढरपूर दि. ७ :- आषाढी यात्रेच्या कालावधीत पाणी पुरवठा, वीज व्यवस्था आणि स्वच्छतेचे नियोजन अतिशय व्यवस्थितरित्या होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी येथे दिल्या.पंढरपूर आषाढी यात्रेच्या तयारीबाबत आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. तुकाराम भवन येथे झालेल्या बैठकीस आमदार भारत भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू व्यासपीठावर उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आषाढी यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती दिली. त्यानंतर विविध पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थान प्रमुखांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. त्यासूचनाबाबत पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, पालखी सोहळा प्रमुख आणि दिंडी प्रमुख यांच्याकडून आलेल्या सूचनांवर संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. वारकरी आणि भाविक यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील,अनुषंगाने वारीचे नियोजन केले जाईल.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या बरोबर जिल्ह्यात येणाऱ्या विविध संतांच्या पालखी आणि दिंडींना योग्य तो पालीस बंदोबस्त पुरवला जाईल. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील रिंगण आणि सोहळा मुक्काम ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.आषाढी यात्रा कालावधीत आणि पालखी तळाच्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा केला जाईल याची काळजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. त्याचबरोबर पालखी मुक्काम तळावर वीज व्यवस्था राहील याची दक्षता महावितरण कंपनीकडून घेतली जाईल, असेही पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.सोलापर जिल्ह्यात सर्व पालख्यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत केले जाईल. पंढरपूर शहरातील आणि वाखरी परिसरातील अतिक्रमणे काढून टाकली जातील. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदी वाहती ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाबरोबर चर्चा करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर मुक्काम असणा?्या दिंडींची अन्यत्र सुयोग्य व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. यात्रा कालावधीत यात्रा कर, सद्याचा पार्किग कर असा कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.पालखी आगमन आणि यात्रा कालावधीत पोलीस बंदोबस्त नेटकेपणाने ठेवला जाईल . वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाईल, असे पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्यावतीने पाणी पुरवठा, आरोग्य आणि स्वच्छता याबाबत नियोजन केले आहे. आवश्यक ते मुनष्यबळ पुरवले जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले.यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अभिजीत मोरे, निवृत्ती महाराज संस्थानचे संजयनाना घोंगडे, संत सोपानकाका महाराज संस्थानचे गोपाळकाका गोसावी, जळगावकर महाराज, भागवत चौरे यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीस सार्वजनिक आरोग्य, महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.----------------------------- पाणी पुरवठा, स्वच्छतेला प्राधान्य- यात्रा कालावधीत चंदभागेत वाहते पाणी राहणार- कोणताही कर आकारला जाणार नाही.- प्रमुख पालख्यांचे प्रशासनामार्फत स्वागत करणार- वाहतूक नियोजनासाठी जास्तीचे पोलीस मागवणार