शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महापौरपदाच्या सोडतीची उत्कंठा

By admin | Updated: August 4, 2014 23:55 IST

महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी सोडत काढावी लागणार आहे. सोडतीत कोणत्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित राहते, याबाबत नगरसेवकांना उत्कंठा लागून राहिली आहे.  
फेब्रुवारी 2क्12 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे. 128 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे 83 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचबरोबर 9 अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी बहुमतात आहे. मार्च 2क्12 मध्ये महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोहिनी लांडे यांना महापौरपदी संधी मिळाली. महापौर लांडे आणि उपमहापौर मिसाळ यांचा कालावधी 12 सप्टेंबरला संपुष्टात येणार आहे. 
दरम्यान, नवीन महापौर निवडण्यासाठी राज्य सरकारला सोडत काढावी लागणार आहे. महापौरपदासाठी सोडत न काढता विद्यमान महापौर, उपमहापौर यांनाच सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. तसा कायदाही केला. मात्र त्या विरोधात उच्च न्यायालयात 22 याचिका दाखल करण्यात आल्या. या कायद्यावरून न्यायालयात राज्य सरकारवर नामुष्की ओढवू नये म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौरांना मुदतवाढ देण्याचा कायदा गेल्या महिन्यात मागे घेतला आहे. त्यामुळे मुदतवाढ न देता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापौरपदाची सोडत काढावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
 
42क्क्7 मध्ये महापौरपद इतर मागासवर्ग महिलांसाठी राखीव होते. त्या वेळी सत्ताधारी राष्ट्रवादीने अडीच वर्षांच्या मुदतीत पहिल्या सव्वा वर्षासाठी वैशाली घोडेकर, तर नंतरच्या सव्वा वर्षासाठी अपर्णा डोके यांना संधी दिली. त्यानंतरची अडीच वर्षे हे पद खुल्या गटासाठी होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी अडीच वर्षे हे पद सांभाळले. त्यानंतर खुल्या गटातील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर मोहिनी लांडे महापौरपद भूषवीत आहेत.