शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: July 2, 2016 01:58 IST

येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत.

उरुळी कांचन : येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत. शिंदवणे रोड परिसर, आश्रम रोड परिसरात कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर आला आहे. तसेच कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. उरुळी कांचन गावात ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात कचराकुंड्यांचे नियोजन केले आहे. पण, कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहने कमी असल्याने हा कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भाडेकरूंची संख्याही झपट्याने वाढत आहे. नोकरदारवर्ग कामाला जाताना घरातील कचऱ्याची प्लॅस्टिकची पिशवी कचराकुंडीत न टाकता पायी जाताना किंवा दुचाकीवरून जाताना कचराकुंडीजवळ रस्त्यावरच फेकून निघून जातो. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी कचरा कचराकुंडीत टाकावा व शिस्त पाळावी, असे आवाहन उपसरपंच सुनील कांचन यांनी केले आहे. या साचलेल्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येथील स्थानिकांना होत आहे. >गाड्यांचे प्रमाण कमीदररोज कचरा उचलण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, कचरा उचलणारे वाहन बंद पडले, की मोठी समस्या निर्माण होते. सोमवारी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. कारण रविवारी सुटीचा दिवस असतो. वाहन दुरुस्त झाले, की तातडीने हा कचरा उचलून पालखीच्या वेळी गावात घाण होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.- कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी