शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: July 2, 2016 01:58 IST

येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत.

उरुळी कांचन : येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत. शिंदवणे रोड परिसर, आश्रम रोड परिसरात कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर आला आहे. तसेच कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. उरुळी कांचन गावात ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात कचराकुंड्यांचे नियोजन केले आहे. पण, कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहने कमी असल्याने हा कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भाडेकरूंची संख्याही झपट्याने वाढत आहे. नोकरदारवर्ग कामाला जाताना घरातील कचऱ्याची प्लॅस्टिकची पिशवी कचराकुंडीत न टाकता पायी जाताना किंवा दुचाकीवरून जाताना कचराकुंडीजवळ रस्त्यावरच फेकून निघून जातो. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी कचरा कचराकुंडीत टाकावा व शिस्त पाळावी, असे आवाहन उपसरपंच सुनील कांचन यांनी केले आहे. या साचलेल्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येथील स्थानिकांना होत आहे. >गाड्यांचे प्रमाण कमीदररोज कचरा उचलण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, कचरा उचलणारे वाहन बंद पडले, की मोठी समस्या निर्माण होते. सोमवारी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. कारण रविवारी सुटीचा दिवस असतो. वाहन दुरुस्त झाले, की तातडीने हा कचरा उचलून पालखीच्या वेळी गावात घाण होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.- कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी