शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

उरुळी कांचनला कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: July 2, 2016 01:58 IST

येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत.

उरुळी कांचन : येथे पालखीच्या मुहूर्तावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, तुरळक पावसाने या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रासले आहेत. शिंदवणे रोड परिसर, आश्रम रोड परिसरात कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर आला आहे. तसेच कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. उरुळी कांचन गावात ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात कचराकुंड्यांचे नियोजन केले आहे. पण, कचरा उचलण्यासाठी लागणारी वाहने कमी असल्याने हा कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भाडेकरूंची संख्याही झपट्याने वाढत आहे. नोकरदारवर्ग कामाला जाताना घरातील कचऱ्याची प्लॅस्टिकची पिशवी कचराकुंडीत न टाकता पायी जाताना किंवा दुचाकीवरून जाताना कचराकुंडीजवळ रस्त्यावरच फेकून निघून जातो. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी कचरा कचराकुंडीत टाकावा व शिस्त पाळावी, असे आवाहन उपसरपंच सुनील कांचन यांनी केले आहे. या साचलेल्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येथील स्थानिकांना होत आहे. >गाड्यांचे प्रमाण कमीदररोज कचरा उचलण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण, कचरा उचलणारे वाहन बंद पडले, की मोठी समस्या निर्माण होते. सोमवारी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. कारण रविवारी सुटीचा दिवस असतो. वाहन दुरुस्त झाले, की तातडीने हा कचरा उचलून पालखीच्या वेळी गावात घाण होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.- कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी