शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

माळघरला भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 9, 2017 03:05 IST

विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यातील माळघर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. या गावाजवळ एक बोअरिंग आहे. मात्र, तिच्यावर दिवसभरात ४० ते ५० हंडेच पाणी निघत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोनच हंडे पाणी ते ही आळीपाळीने भरावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी टँकरची मागणी करूनही पंचायत समितीकडून अद्याप तो पुरविला गेला नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या माळघर गावात ५५ कुटुंबे राहत राहत असून परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हे गांव डोंगरावर असल्याने या गावातील नागरिकांसाठी तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात नदी, नाले असा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ आली आहे. या बोरिंगवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकाचे नंबर ठरवून घेतले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला दोनच हंडे पाणी मिळते. त्यामुळे नंबर लागण्यासाठी सात ते आठ तास वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी जव्हार पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही अद्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावात माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तर तेथील जनावरांची हालत काय असेल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. बोअरिंगवर नंबर लावण्यासाठी येथील महिलांवर कधी रात्री तर कधी भल्या पहाटे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाणी भरण्यासाठी भांडणे ही होतात. >‘आमच्या गावाचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. आम्हाला रात्री बेरात्री पाण्यासाठी जंगलातील बोअरिंगवर जावे लागते. शासनाने लक्ष घालून टँकरची सोय करावी. - संगीता कोंगील, गृहिंणी,ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी पंचायत समितीकडे पाण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र,त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. - गोविंद गावित, माजी सरपंच