शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

माळघरला भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 9, 2017 03:05 IST

विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यातील माळघर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. या गावाजवळ एक बोअरिंग आहे. मात्र, तिच्यावर दिवसभरात ४० ते ५० हंडेच पाणी निघत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोनच हंडे पाणी ते ही आळीपाळीने भरावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी टँकरची मागणी करूनही पंचायत समितीकडून अद्याप तो पुरविला गेला नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या माळघर गावात ५५ कुटुंबे राहत राहत असून परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हे गांव डोंगरावर असल्याने या गावातील नागरिकांसाठी तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात नदी, नाले असा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ आली आहे. या बोरिंगवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकाचे नंबर ठरवून घेतले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला दोनच हंडे पाणी मिळते. त्यामुळे नंबर लागण्यासाठी सात ते आठ तास वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी जव्हार पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही अद्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावात माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तर तेथील जनावरांची हालत काय असेल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. बोअरिंगवर नंबर लावण्यासाठी येथील महिलांवर कधी रात्री तर कधी भल्या पहाटे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाणी भरण्यासाठी भांडणे ही होतात. >‘आमच्या गावाचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. आम्हाला रात्री बेरात्री पाण्यासाठी जंगलातील बोअरिंगवर जावे लागते. शासनाने लक्ष घालून टँकरची सोय करावी. - संगीता कोंगील, गृहिंणी,ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी पंचायत समितीकडे पाण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र,त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. - गोविंद गावित, माजी सरपंच