शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

माळघरला भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 9, 2017 03:05 IST

विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यातील माळघर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. या गावाजवळ एक बोअरिंग आहे. मात्र, तिच्यावर दिवसभरात ४० ते ५० हंडेच पाणी निघत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोनच हंडे पाणी ते ही आळीपाळीने भरावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी टँकरची मागणी करूनही पंचायत समितीकडून अद्याप तो पुरविला गेला नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या माळघर गावात ५५ कुटुंबे राहत राहत असून परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हे गांव डोंगरावर असल्याने या गावातील नागरिकांसाठी तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात नदी, नाले असा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ आली आहे. या बोरिंगवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकाचे नंबर ठरवून घेतले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला दोनच हंडे पाणी मिळते. त्यामुळे नंबर लागण्यासाठी सात ते आठ तास वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी जव्हार पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही अद्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावात माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तर तेथील जनावरांची हालत काय असेल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. बोअरिंगवर नंबर लावण्यासाठी येथील महिलांवर कधी रात्री तर कधी भल्या पहाटे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाणी भरण्यासाठी भांडणे ही होतात. >‘आमच्या गावाचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. आम्हाला रात्री बेरात्री पाण्यासाठी जंगलातील बोअरिंगवर जावे लागते. शासनाने लक्ष घालून टँकरची सोय करावी. - संगीता कोंगील, गृहिंणी,ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी पंचायत समितीकडे पाण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र,त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. - गोविंद गावित, माजी सरपंच