शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

आपटी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: April 27, 2016 01:39 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी गाव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी गाव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्यापाठोपाठ आता आपटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने येथे टँकरने पाणी देणेही शक्य नाही. पाण्यासाठी आपटीकरांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. येथील पारंपरिक पाणीसाठे संपुष्टात आले असून विहिरीला झऱ्याचे पाणी टिपून टिपून आळीपाळीने हंडे भरण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. केवळ पाणी एके पाणी या एकाच कामासाठी येथील महिलांचा दिवस अन् रात्र खर्ची होत आहे. पाण्यासाठी महिलांची झोप उडाली आहे. आपटी या गावाकडे प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी एक आदिवासी गाव. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. दळणवळणासाठी कोणतीच सुविधा नसल्याने प्रशासनाच्या नजरेतूनही या गावाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता न मिळाल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञातवासात राहत आहे. पिढ्यांमागून पिढ्या सरल्या, मात्र रस्ता होण्याऐवजी मागण्या-निवेदनांना प्रत्येक वेळी सरकारदरबारी केराचीच टोपली मिळत आली आहे. रस्त्याला वनविभागाच्या हरकतीमुळे आपटीच्या आदिवासींचे जीणे मुश्कील झाले असून कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्याने या गावातील गावकरी त्रस्त झाले आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी फार वर्षांपूर्वी येथील गावकऱ्यांनी दोन विहिरी बांधल्या आहेत. मात्र या विहिरींचीही परिस्थिती अतिशय बिकट आहे. वर्षानुवर्षे डागडुजीची कामे न झाल्याने कठडे तुटलेल्या या विहिरी धोकादायक झाल्या आहेत. याच विहिरीच्या दगडावर एक पाय आत व एक पाय बाहेर ठेवून येथील महिला पाणी ओढत असल्याचे भयाण चित्र येथे पाहावयास मिळाले. या विहिरीपैकी गावाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या विहिरीचा वापर गावकरी वापरण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी करतात.