शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

आपटी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: April 27, 2016 01:39 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी गाव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उंच डोंगरावर वसलेले आपटी गाव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिले आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्यापाठोपाठ आता आपटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने येथे टँकरने पाणी देणेही शक्य नाही. पाण्यासाठी आपटीकरांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. येथील पारंपरिक पाणीसाठे संपुष्टात आले असून विहिरीला झऱ्याचे पाणी टिपून टिपून आळीपाळीने हंडे भरण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. केवळ पाणी एके पाणी या एकाच कामासाठी येथील महिलांचा दिवस अन् रात्र खर्ची होत आहे. पाण्यासाठी महिलांची झोप उडाली आहे. आपटी या गावाकडे प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी एक आदिवासी गाव. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. दळणवळणासाठी कोणतीच सुविधा नसल्याने प्रशासनाच्या नजरेतूनही या गावाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता न मिळाल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञातवासात राहत आहे. पिढ्यांमागून पिढ्या सरल्या, मात्र रस्ता होण्याऐवजी मागण्या-निवेदनांना प्रत्येक वेळी सरकारदरबारी केराचीच टोपली मिळत आली आहे. रस्त्याला वनविभागाच्या हरकतीमुळे आपटीच्या आदिवासींचे जीणे मुश्कील झाले असून कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्याने या गावातील गावकरी त्रस्त झाले आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी फार वर्षांपूर्वी येथील गावकऱ्यांनी दोन विहिरी बांधल्या आहेत. मात्र या विहिरींचीही परिस्थिती अतिशय बिकट आहे. वर्षानुवर्षे डागडुजीची कामे न झाल्याने कठडे तुटलेल्या या विहिरी धोकादायक झाल्या आहेत. याच विहिरीच्या दगडावर एक पाय आत व एक पाय बाहेर ठेवून येथील महिला पाणी ओढत असल्याचे भयाण चित्र येथे पाहावयास मिळाले. या विहिरीपैकी गावाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या विहिरीचा वापर गावकरी वापरण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी करतात.