शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सिंचन योजनेपासून वंचित

By admin | Updated: May 30, 2016 01:43 IST

दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

खोर : दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या या भागामध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. दुष्काळाच्या झळा एवढ्या तीव्र झाल्या आहेत, की पाणी अडवणुकीचे सर्वच जलस्रोत रिकामे झालेले असून, पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होत आहे. खोर परिसरामध्ये पद्मावती, फडतरेवस्ती व डोंबेवाडी पाझर तलाव असे तीन मोठे तलाव आहेत. मात्र, हे तलाव सध्या पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दौंडमधून बारामतीला पाणी नेण्यात येत आहे. मात्र, दौंडची जनता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. पैसे भरले, आंदोलने केली, तरच पाणी मिळते, हाच कायदा सध्या जास्तच जोर धरून आहे. पुरंदर जलसिंचन उपसा योजना व जनाई-शिरसाई उपसा योजना या सिंचनाच्या योजना सध्या कार्यान्वित असूनदेखील दौंडकरांना याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वरवंड तलावातून पाणी सुप्याच्या तलावात जनाई योजनेतून सोडण्यात आले आहे. मात्र, ज्या गावांना सध्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत त्याच गावामधून योजनेची पाईपलाईन गेली आहे. त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेण्याची वेळ आली आहे. >पैसे भरलेच नाही : पाणी देण्यास टाळाटाळ खोर, देऊळगावगाडा परिसराला सिंचन योजनेतून पैसे न भरल्याने पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे. या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न असलेली शेतीच सध्या पडीक असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहार मंदावला गेला असल्याने सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी पैसे भरावयाचे तरी कोठून? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षातून किमान दोन आवर्तने दौंडमधील दुष्काळी भागाला मिळणे गरजेचे आहे. पुरंदरमधील व बारामतीमधील दुष्काळी गावांना कार्यान्वित सिंचन योजनांचे पाणी सध्याच्या कालावधीत सुटले गेले आहे. मात्र, आम्ही दौंडकरांनी केवळ पैसे भरले नाही म्हणून आम्हाला पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे, अशी व्यथा खोर व देऊळगावगाडा भागामधील नागरिकांची आहे. सध्याच्या बेताल परिस्थितीमध्ये एक तरी आवर्तन द्या, अशी हाक या भागामधील जनतेची आहे.