शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सिंचन योजनेपासून वंचित

By admin | Updated: May 30, 2016 01:43 IST

दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

खोर : दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या या भागामध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. दुष्काळाच्या झळा एवढ्या तीव्र झाल्या आहेत, की पाणी अडवणुकीचे सर्वच जलस्रोत रिकामे झालेले असून, पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होत आहे. खोर परिसरामध्ये पद्मावती, फडतरेवस्ती व डोंबेवाडी पाझर तलाव असे तीन मोठे तलाव आहेत. मात्र, हे तलाव सध्या पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दौंडमधून बारामतीला पाणी नेण्यात येत आहे. मात्र, दौंडची जनता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. पैसे भरले, आंदोलने केली, तरच पाणी मिळते, हाच कायदा सध्या जास्तच जोर धरून आहे. पुरंदर जलसिंचन उपसा योजना व जनाई-शिरसाई उपसा योजना या सिंचनाच्या योजना सध्या कार्यान्वित असूनदेखील दौंडकरांना याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वरवंड तलावातून पाणी सुप्याच्या तलावात जनाई योजनेतून सोडण्यात आले आहे. मात्र, ज्या गावांना सध्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत त्याच गावामधून योजनेची पाईपलाईन गेली आहे. त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेण्याची वेळ आली आहे. >पैसे भरलेच नाही : पाणी देण्यास टाळाटाळ खोर, देऊळगावगाडा परिसराला सिंचन योजनेतून पैसे न भरल्याने पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे. या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न असलेली शेतीच सध्या पडीक असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहार मंदावला गेला असल्याने सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी पैसे भरावयाचे तरी कोठून? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षातून किमान दोन आवर्तने दौंडमधील दुष्काळी भागाला मिळणे गरजेचे आहे. पुरंदरमधील व बारामतीमधील दुष्काळी गावांना कार्यान्वित सिंचन योजनांचे पाणी सध्याच्या कालावधीत सुटले गेले आहे. मात्र, आम्ही दौंडकरांनी केवळ पैसे भरले नाही म्हणून आम्हाला पाणी देण्यास टाळाटाळ होत आहे, अशी व्यथा खोर व देऊळगावगाडा भागामधील नागरिकांची आहे. सध्याच्या बेताल परिस्थितीमध्ये एक तरी आवर्तन द्या, अशी हाक या भागामधील जनतेची आहे.