शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

नैराश्यापोटी वडिलांनीच घेतला अपत्यांचा जीव !

By admin | Updated: April 26, 2015 01:55 IST

पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली असता, नैराश्यातून वडिलांच्या हातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय इंगळे (४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) यांचे मृतदेह पातूर तालुक्यातील आस्टुल येथे २१ एप्रिल रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. संजय इंगळे हे आस्टुल गावातील प्रतिष्ठित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर बागायती शेती होती; मात्र ही शेती त्यांच्या नावे नव्हती. घरात वीज नव्हती़ एवढंच काय, झोपण्यासाठी घरात पलंगही नाही. पोलिसांनी त्यांचे बॅँक खाते तपासले असता, खात्यात केवळ एक हजार रुपये होते. त्यांच्या दोन्ही मुली लग्नाच्या होत्या; मात्र हातात पैसा नाही. शेती नावावर नसताना मुलींच्या लग्न करायचे कसे, या विवंचनेत ते होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. गावातून हातउसणे घेतलेले पैसे त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी परत केले होते.दरम्यान, दोन मुलींचा गळा आवळल्याने व उर्वरित तिघांचा अर्थात पती-पत्नी व मुलगा यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. पाचही मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस गुन्ह्यात पुढील कलमांची वाढ करणार आहेत. (वार्ताहर)