शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नैराश्यापोटी वडिलांनीच घेतला अपत्यांचा जीव !

By admin | Updated: April 26, 2015 01:55 IST

पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली असता, नैराश्यातून वडिलांच्या हातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय इंगळे (४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) यांचे मृतदेह पातूर तालुक्यातील आस्टुल येथे २१ एप्रिल रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. संजय इंगळे हे आस्टुल गावातील प्रतिष्ठित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर बागायती शेती होती; मात्र ही शेती त्यांच्या नावे नव्हती. घरात वीज नव्हती़ एवढंच काय, झोपण्यासाठी घरात पलंगही नाही. पोलिसांनी त्यांचे बॅँक खाते तपासले असता, खात्यात केवळ एक हजार रुपये होते. त्यांच्या दोन्ही मुली लग्नाच्या होत्या; मात्र हातात पैसा नाही. शेती नावावर नसताना मुलींच्या लग्न करायचे कसे, या विवंचनेत ते होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. गावातून हातउसणे घेतलेले पैसे त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी परत केले होते.दरम्यान, दोन मुलींचा गळा आवळल्याने व उर्वरित तिघांचा अर्थात पती-पत्नी व मुलगा यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. पाचही मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस गुन्ह्यात पुढील कलमांची वाढ करणार आहेत. (वार्ताहर)