शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यापोटी वडिलांनीच घेतला अपत्यांचा जीव !

By admin | Updated: April 26, 2015 01:55 IST

पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथे एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी आतापर्यंतच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली असता, नैराश्यातून वडिलांच्या हातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय इंगळे (४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) यांचे मृतदेह पातूर तालुक्यातील आस्टुल येथे २१ एप्रिल रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. संजय इंगळे हे आस्टुल गावातील प्रतिष्ठित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर बागायती शेती होती; मात्र ही शेती त्यांच्या नावे नव्हती. घरात वीज नव्हती़ एवढंच काय, झोपण्यासाठी घरात पलंगही नाही. पोलिसांनी त्यांचे बॅँक खाते तपासले असता, खात्यात केवळ एक हजार रुपये होते. त्यांच्या दोन्ही मुली लग्नाच्या होत्या; मात्र हातात पैसा नाही. शेती नावावर नसताना मुलींच्या लग्न करायचे कसे, या विवंचनेत ते होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. गावातून हातउसणे घेतलेले पैसे त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी परत केले होते.दरम्यान, दोन मुलींचा गळा आवळल्याने व उर्वरित तिघांचा अर्थात पती-पत्नी व मुलगा यांचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. पाचही मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस गुन्ह्यात पुढील कलमांची वाढ करणार आहेत. (वार्ताहर)