शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारा

By admin | Updated: February 27, 2017 12:22 IST

शेतकरी चिंतीत: बारदाना आणि गोदामांची वानवा

राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा बोजवारानारायण चव्हाण - आॅनलाईन लोकमत सोलापूरराज्य शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या तूर खरेदी केंद्रात सध्या शुकशुकाट आहे. तूर साठवण्यासाठी गोदामांची कमतरता आणि बारदान्याची टंचाई ही त्यामागची कारणे सांगितली जात आहेत. येत्या काही दिवसात हमीभावाची तूर खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत तर तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शासनाच्या संदिग्ध भूमिकेने चिंतीत झाला आहे. मिळेत त्या भावाने तुरीची बाजारात विक्री करण्याचा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.राज्यात नाफेडकडून हमीभावाने तूर खरेदीची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तुरीला ५०५० रुपये हमीभाव देण्यात आल्याने बाजारात होणाऱ्या भावातील घसरणीला पर्याय मिळाला. परंतु पणन मंडळासह तूर खरेदी केंद्र चालवणाऱ्या राज्य वखार महामंडळ, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी उत्पादन कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून तुरीची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तूर विक्रीसाठी आलेला शेतकरी चार-चार दिवस शेतमालामुळे बाजारपेठांमध्ये मुक्कामी राहत आहे. ---------------------बारदाना टंचाईमार्केटिंग फेडरेशनला यंदाच्या हंगामात १५ लाख क्विंटल हमीभावाने तूर खरेदी करण्याचा इष्टांक देण्यात आला होता. आतापर्यंत फेडरेशनने १३ लाख क्विंटलहून अधिक खरेदी केली आहे. याशिवाय विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने ४ लाख क्विंटल, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ३.५ लाख क्विंटल, राज्य वखार महामंडळाने ४ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. तुरीसाठी बारदान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक हमीभाव केंद्रांवर बारदाना टंचाईचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.----------------------- गोदामांची समस्या खरेदी केलेल्या तुरीची पोती साठवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या गोदामांची साठवण क्षमता अपुरी पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वखार महामंडळाची गोदामे आहेत. अन्य शेतीमालासह तुरीच्या साठवणुकीने ही सर्व गोदामे तुडुंब भरली आहेत. नव्याने खरेदी सुरु केली तर हा माल साठवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. खरेदी केंद्रांपासून ५० कि. मी. च्या अंतरावरील गोदामात होणारा वाहतूक खर्च मार्केटिंग फेडरेशनकडून केला जातो. त्यापुढील अंतरावर असलेल्या गोदामात वाहतूक करण्याचा भार कोण उचलणार हा प्रश्न पणन खात्यासमोर आहे.--------------------सहकारमंत्र्यांचा पाठपुरावाकोणत्याही स्थितीत तुरीची हमीभाव केंद्रे बंद करायची नाहीत यावर राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख ठाम आहेत. खरेदी केंद्रांसंदर्भात आलेल्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकतीच पणन महामंडळ, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केवळ १५ लाख तूर खरेदीची परवानगी राज्याला दिली होती. हा इष्टांक पूर्ण झाला आहे तरीही राज्यातील खरेदी केंद्रांवर तुरीची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने वाढीव तूर खरेदीची परवानगी मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.------------------------बाजारभावात घसरणशासनाचे तूर खरेदी केंद्र बंद पडल्याने व्यापारी, दाळ उत्पादक कंपन्या आणि दलालांची चांदी झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावाने तूर खरेदी करण्याचा सपाटा या मंडळींनी चालवला आहे. त्यामुळे तुरीच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. ५०५० रुपये हमीभाव असताना बाजारभाव ४२०० रुपयांपर्यंत होता. आता त्यात आणखी घट झाली असून, ३७०० ते ४ हजारांपर्यंत तो घसरला आहे. -----------------------तुरीच्या बारदान्याची कमतरता आहे. शिल्लक बारदाना असेल तेथे खरेदी सुरु आहे. वाढीव बारदान्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन दिवसांत कलकत्त्याहून बारदाणा उपलब्ध होताच पुन्हा खरेदी केंद्रे सुरु होतील.- डॉ. राजाराम दिघेमुख्य कार्यकारी अधिकारी, पणन महामंडळ, पुणे