शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

विभागीय टपाल कार्यालय लातूरला हलविले..!

By admin | Updated: April 18, 2017 05:41 IST

उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविल्याची माहिती

उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने दिली. यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.१९७२ पासून उस्मानाबाद येथे हे कार्यालय कार्यान्वित होते. उस्मानाबादमधून लातूर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर या जिल्ह्यासाठी विभागीय टपाल कार्यालयाची निर्मिती होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने उस्मानाबाद येथीलच टपाल कार्यालय लातूरला हलविण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर-२०१६ मध्ये याची कुणकुण टपाल कर्मचारी संघटनेला लागल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन दिले होते. यावर आ. पाटील यांनीही औरंगाबाद येथील जनरल पोस्ट मास्तर यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर न करण्याचे सूचविले होते. यावर पोस्ट मास्तरांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते.सर्वांना अंधारात ठेवत हे कार्यालय हलविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने म्हटले आहे की, वास्तविक अशा प्रकारच्या स्थानांतर करण्यासाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)