शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी खात्याचा कारभार राज्यमंत्र्याविना !

By admin | Updated: January 1, 2015 02:26 IST

शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राची वाटचाल कृषी राज्यमंत्र्याशिवाय सुरू आहे

१५ वर्षांत प्रथमच : कॅबिनेटही प्रभारी, सात हजार कोटींच्या पॅकेजवर नियंत्रण कुणाचे ?राजेश निस्ताने - यवतमाळशेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राची वाटचाल कृषी राज्यमंत्र्याशिवाय सुरू आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्रीही प्रभारी आहेत. राज्याच्या गेल्या १५ वर्षांच्या सरकारात पहिल्यांदाच कृषी खात्यावर अशी वेळ आली आहे. महाराष्ट्र हा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या सावटात असूनही राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने आपल्या मंत्रीमंडळात या खात्याची दखल घेतलेली नाही. राज्यात कृषी खात्याला एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रभारी कॅबिनेट मंत्री आहेत. मुळात ते महसूल मंत्री आहेत. याशिवाय त्यांच्याकडे कृषीसह अन्य १४ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषी खात्याला कुणीही राज्यमंत्री दिलेला नाही. राज्यमंत्री नसलेले कृषी हे एकमेव खाते युती सरकारमध्ये आहे. प्रभारी कॅबिनेट मंत्र्यांवरच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात कृषी खात्याशी संबंधित काही तारांकित प्रश्न होते. त्यावर उत्तरे सादर करण्यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलविण्यात आले होते. मात्र कॅबिनेट मंत्र्यांनी उत्तरावर चर्चेला फार वेळ न देता ‘बुलेट पॉर्इंट’मध्ये पाच ओळीत उत्तर सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावरून खडसे यांच्याकडील विविध खात्यांच्या कामाचा व्याप लक्षात येतो. हे पाहता ते खरोखरच कृषी खात्याला न्याय देऊ शकत असतील काय, याची कल्पना येते. कॅबिनेट मंत्री प्रभारी आहेत आणि राज्यमंत्री तर नाहीतच त्यामुळे कृषी खात्याची राज्यभरातील यंत्रणा अगदी बिनधास्त आहे. दौरे नाही आणि आढावाही नाही. कृषी खात्याच्या योजनांची अंमलबजावणी, फाईलींची मंजुरी, अनुदान वाटप प्रभावित होत आहे. शासकीय कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेणारे, जाब विचारणारे सरकारमधील कुणी नसल्याने कृषी खात्याची यंत्रणा ‘रिलॅक्स’ दिसत आहे. अपर मुख्य सचिव (कृषी) डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्याच नेतृत्त्वात सध्या कृषी खात्याचे कामकाज चालविले जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सात हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. मात्र शासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारे मंत्री, राज्यमंत्री अस्तित्वात नसतील तर पॅकेजची अंमलबजावणी होणार कशी, हा मुख्य प्रश्न आहे.