शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कृषी खात्याचा कारभार राज्यमंत्र्याविना !

By admin | Updated: January 1, 2015 02:26 IST

शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राची वाटचाल कृषी राज्यमंत्र्याशिवाय सुरू आहे

१५ वर्षांत प्रथमच : कॅबिनेटही प्रभारी, सात हजार कोटींच्या पॅकेजवर नियंत्रण कुणाचे ?राजेश निस्ताने - यवतमाळशेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राची वाटचाल कृषी राज्यमंत्र्याशिवाय सुरू आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्रीही प्रभारी आहेत. राज्याच्या गेल्या १५ वर्षांच्या सरकारात पहिल्यांदाच कृषी खात्यावर अशी वेळ आली आहे. महाराष्ट्र हा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या सावटात असूनही राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने आपल्या मंत्रीमंडळात या खात्याची दखल घेतलेली नाही. राज्यात कृषी खात्याला एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रभारी कॅबिनेट मंत्री आहेत. मुळात ते महसूल मंत्री आहेत. याशिवाय त्यांच्याकडे कृषीसह अन्य १४ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषी खात्याला कुणीही राज्यमंत्री दिलेला नाही. राज्यमंत्री नसलेले कृषी हे एकमेव खाते युती सरकारमध्ये आहे. प्रभारी कॅबिनेट मंत्र्यांवरच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात कृषी खात्याशी संबंधित काही तारांकित प्रश्न होते. त्यावर उत्तरे सादर करण्यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलविण्यात आले होते. मात्र कॅबिनेट मंत्र्यांनी उत्तरावर चर्चेला फार वेळ न देता ‘बुलेट पॉर्इंट’मध्ये पाच ओळीत उत्तर सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावरून खडसे यांच्याकडील विविध खात्यांच्या कामाचा व्याप लक्षात येतो. हे पाहता ते खरोखरच कृषी खात्याला न्याय देऊ शकत असतील काय, याची कल्पना येते. कॅबिनेट मंत्री प्रभारी आहेत आणि राज्यमंत्री तर नाहीतच त्यामुळे कृषी खात्याची राज्यभरातील यंत्रणा अगदी बिनधास्त आहे. दौरे नाही आणि आढावाही नाही. कृषी खात्याच्या योजनांची अंमलबजावणी, फाईलींची मंजुरी, अनुदान वाटप प्रभावित होत आहे. शासकीय कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेणारे, जाब विचारणारे सरकारमधील कुणी नसल्याने कृषी खात्याची यंत्रणा ‘रिलॅक्स’ दिसत आहे. अपर मुख्य सचिव (कृषी) डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्याच नेतृत्त्वात सध्या कृषी खात्याचे कामकाज चालविले जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सात हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. मात्र शासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारे मंत्री, राज्यमंत्री अस्तित्वात नसतील तर पॅकेजची अंमलबजावणी होणार कशी, हा मुख्य प्रश्न आहे.