शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 04:23 IST

चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.

मुंबई : टाटा उद्योग समूहाची नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून दूर केल्यानंतरही, समूहातील अनेक कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.समूहाच्या चेअरमन पदावरून हटविल्यानंतर मिस्त्री आपणहून समूहातील कंपन्यांवरील पदे सोडतील, अशी समूहाच्या धुरिणांची अपेक्षा होती, परंतु समूहातील कंपन्यांचे चेअरमनपद सोडण्याचा मिस्त्री यांचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करताना, त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, मिस्त्री समूहामधील त्यांच्या सर्व पदांची कायदेशीर जबाबदारी या पुढेही पार पाडत राहतील. समूहातील प्रत्येक कंपनी, कंपनी कायद्यानुसार स्वतंत्रपणे नोंदलेली आहे व तिचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे. मिस्त्रींनी या कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून सोडले नाही, तर प्रत्येक कंपन्यांच्या संचालक मंडळात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना दूर करावे लागेल. ही प्रक्रिया वेळकाढू तर आहेच, शिवाय समूहात निर्माण झालेला वादंग सामोपचाराने मिटविण्याऐवजी, त्यामुळे कटुता आणखी वाढण्याची शक्यता निरीक्षकांना वाटते. टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रुअरेजेस, टाटा इंडस्ट्रिज व टाटा टेलिसर्व्हिसेस अशा समूहातील अनेक कंपन्यांचे मिस्त्री हे अद्यापही चेअरमन आहेत. त्रैमासिक हिशेबांना मंजुरी देण्यासाठी इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका अनुक्रमे उद्या (४ नोव्हेंबर) व १० नोव्हेंबर रोजी व्हायच्या आहेत. त्या बैठका चेअरमन या नात्याने मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणे अपरिहार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)>शेअरहोल्डर्सची संमती आवश्यकसायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बड्या कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत, तसेच टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे ते आजही संचालक आहेत. या संचालक मंडळावरून त्यांना हटवणे सोपे नाही. कारण त्याला शेअरहोल्डर्सची परवानगी लागेल. शेअरहोल्डर्स सहजासहजी मिस्त्री यांना संचालकपदावरून हटवण्यास संमती देतील का, याविषयी उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.>टाटा-मिस्त्री वादावर सरकारची नजर - मेघवालरतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या वादावर केंद्र सरकारची नजर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. १00 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा व्यवसाय असलेल्या टाटा उद्योग समूहातील ताज्या घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकारची त्यावर नजर आहे.तथापि, या वादापासून सरकार दूरच राहील. कंपनीचा हा अंतर्गत मामला आहे. या वादाबाबत आतापर्यंत कॉर्पोरेट मंत्रालयाकडे लिखित स्वरूपात काहीही आलेले नाही, असे मेघवाल यांनी सांगितले. रतन टाटा व सायरस मिस्त्री या दोघांनी अलीकडेच स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि समूहातील वादांबाबत आपले म्हणणे त्यांच्या कानी घातले होते.