शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 04:23 IST

चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.

मुंबई : टाटा उद्योग समूहाची नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून दूर केल्यानंतरही, समूहातील अनेक कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत.समूहाच्या चेअरमन पदावरून हटविल्यानंतर मिस्त्री आपणहून समूहातील कंपन्यांवरील पदे सोडतील, अशी समूहाच्या धुरिणांची अपेक्षा होती, परंतु समूहातील कंपन्यांचे चेअरमनपद सोडण्याचा मिस्त्री यांचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करताना, त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, मिस्त्री समूहामधील त्यांच्या सर्व पदांची कायदेशीर जबाबदारी या पुढेही पार पाडत राहतील. समूहातील प्रत्येक कंपनी, कंपनी कायद्यानुसार स्वतंत्रपणे नोंदलेली आहे व तिचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे. मिस्त्रींनी या कंपन्यांचे चेअरमनपद स्वत:हून सोडले नाही, तर प्रत्येक कंपन्यांच्या संचालक मंडळात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना दूर करावे लागेल. ही प्रक्रिया वेळकाढू तर आहेच, शिवाय समूहात निर्माण झालेला वादंग सामोपचाराने मिटविण्याऐवजी, त्यामुळे कटुता आणखी वाढण्याची शक्यता निरीक्षकांना वाटते. टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रुअरेजेस, टाटा इंडस्ट्रिज व टाटा टेलिसर्व्हिसेस अशा समूहातील अनेक कंपन्यांचे मिस्त्री हे अद्यापही चेअरमन आहेत. त्रैमासिक हिशेबांना मंजुरी देण्यासाठी इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका अनुक्रमे उद्या (४ नोव्हेंबर) व १० नोव्हेंबर रोजी व्हायच्या आहेत. त्या बैठका चेअरमन या नात्याने मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणे अपरिहार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)>शेअरहोल्डर्सची संमती आवश्यकसायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बड्या कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत, तसेच टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे ते आजही संचालक आहेत. या संचालक मंडळावरून त्यांना हटवणे सोपे नाही. कारण त्याला शेअरहोल्डर्सची परवानगी लागेल. शेअरहोल्डर्स सहजासहजी मिस्त्री यांना संचालकपदावरून हटवण्यास संमती देतील का, याविषयी उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.>टाटा-मिस्त्री वादावर सरकारची नजर - मेघवालरतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या वादावर केंद्र सरकारची नजर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. १00 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा व्यवसाय असलेल्या टाटा उद्योग समूहातील ताज्या घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकारची त्यावर नजर आहे.तथापि, या वादापासून सरकार दूरच राहील. कंपनीचा हा अंतर्गत मामला आहे. या वादाबाबत आतापर्यंत कॉर्पोरेट मंत्रालयाकडे लिखित स्वरूपात काहीही आलेले नाही, असे मेघवाल यांनी सांगितले. रतन टाटा व सायरस मिस्त्री या दोघांनी अलीकडेच स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि समूहातील वादांबाबत आपले म्हणणे त्यांच्या कानी घातले होते.