शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डेंगी, चिकुनगुनियासदृश ५०० रुग्ण

By admin | Updated: September 22, 2016 02:09 IST

शहरात डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले.

इंदापूर : शहरात डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. तथापि, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या व नगर परिषद आरोग्य विभागाच्या प्रमुखांच्या दाव्यानुसार शहरातील परिस्थिती जिल्ह्यातील इतर ठिकाणांएवढी गंभीर नाही. दीड महिन्यापासून शहरातील डॉ. आंबेडकरनगर, अण्णा भाऊ साठेनगर, आठभाईमळा, सरस्वतीनगर, वडारगल्ली व शहराच्या वाढीव हद्दीतील दत्तनगर, गणेशनगर आदी भागांत डेंगी, चिकुनगुनियासदृश रोगांची लक्षणे असणारे रुग्ण आहेत. शहरात अशी लक्षणे असणारे किमान ५०० रुग्ण असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे म्हणाले, की गेल्या पंधरा ते वीस दिवसांत खासगी रुग्णालयात पाच ते सहा व उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ते तीन रुग्णांना चिकुनगुनिया झाल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावरील उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. रुग्णालयात असे रुग्ण दाखल करण्याची, संबंधित सर्व तपासण्या करण्याची सोय आहे. औषधेदेखील आहेत. एनएसवन हे किटही उपलब्ध आहे. शहरात मलेरिया नियंत्रण विभागाचे कर्मचारी निरंतर सर्वेक्षण करीत आहेत. (वार्ताहर)नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुजय मखरे यांनी सांगितले, की डासांच्या निर्मूलनासाठी यंत्राच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येते. मंडई, कत्तलखाने, कचराकुंड्या या ठिकाणी बेगॉन, पॅरथम, बीसी पावडर, मलेरिया आॅईलचा वापर केला जातो आहे. पाच कर्मचाऱ्यांचीयासाठी नेमणूक करण्यात आली आहे. महिलांची १०५, पुरुषांची ९५ सार्वजनिक शौचालये दररोज साफ केली जात आहेत. या संदर्भात पाहणी केली असता, डॉ. आंबेडकरनगर, अण्णा भाऊ साठेनगर, कसाबगल्ली या भागातील अस्वच्छता, उघडी गटारे अशा रोगांच्या प्रसाराची केंद्रे झाल्याचे दिसून येते. इंदापूर शहरातील इतर भागांत झाकीव गटारे झाली आहेत, होत आहेत. डॉ. आंबेडकरनगरमध्ये गटारांची दुरवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही, अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे यांनी केल्या.नगर परिषदेकडे १० ते १२ वर्षांपूर्वी घेतलेली चार धुरळणी यंत्रे आहेत. त्यांपैकी तीन नादुरुस्त आहेत.>कुरवली परिसरात जांब, मानकरवाडी, चिखली, कदमवस्ती, मानेवस्ती या भागातील वाड्यावस्त्यांत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.स्वच्छतेचा बाबतीत घ्यावी लागणारी काळजी, मुलाचे आरोग्य, परिसर स्वच्छता, आजाराबाबत स्वच्छतेचे महत्त्व वाड्यावस्त्यांतील नागरिकांना सांगण्यात येत आहे.असल्यामुळे या भागात डेंगी व चिकुनगुनियाचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य उपकेंद्रातून देण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने परिसरातील कुरवली व मानकरवाडी या विद्यालयांत डेंगी व चिकुनगुनिया आजारांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपकेंद्राने दिली आहे. नवीन यंत्र घेण्याचा विचार नगर परिषद करीत नाही, ही मोठी अडचण आहे. एकाच यंत्रावर काम चालवले जाते.या रोगांविषयी घ्यायच्या दक्षतेची माहिती असणारे पत्रक शहरात वाटण्यात आले आहे.