शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

By admin | Updated: November 8, 2016 04:55 IST

सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल

इस्लामपूर (जि. सांगली) : सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपुरातील घरासमोर निदर्शने केली. विठुनामाचा गजर करतानाच खोत यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांनी यातील १९ कार्यकर्त्यांवर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर धडक मारली. मात्र पोलिसांनी ३०० फूट अंतरावरच त्यांना रोखल्यामुळे, जवळपास चार तास तेथेच विठुनामाचा गजर करीत आंदोलक थांबले. खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध करण्यात आला. शंभरावर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.या वेळी बळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एफआरपी अधिक १७५ रुपयांचा तोडगा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रणच आहे. या तोडग्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३५०० रुपयांची पहिली उचल घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. आता सत्तेत सहभाग असल्यामुळे आंदोलन टाळून तोडग्याच्या नावाखाली पुन्हा त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका असून तो आम्ही हाणून पाडणार आहोत. (वार्ताहर)सदाभाऊ निघाले दौऱ्यावरमुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारत विक्री करण्याची व्यवस्था सुरू केल्यानंतर आता पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन राज्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. कांदा आणि इतर शेतमालाचे भाव अधुनमधून पडतात आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. पश्चिम बंगालमध्ये आणि तेथून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यापैकी ८० टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जातो. या शिवाय, द्राक्षे, बेदाणे, संत्री, मोसंबी, डाळींबही मोठ्या प्रमाणात पाठविले जाते. हा शेतमाल दलालांच्या विविध टप्प्यांतून पाठविण्याऐवजी त्याला या दोन राज्यांमध्ये थेट बाजारपेठेत विक्रीला नेण्याचा विचार आता समोर आला आहे. त्या दृष्टीनेच या दोन राज्यांमध्ये जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना दिले.