शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर निदर्शने

By admin | Updated: November 8, 2016 04:55 IST

सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल

इस्लामपूर (जि. सांगली) : सांगली—कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर काढलेल्या ऊसदराच्या तोडग्यास विरोध करीत सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपुरातील घरासमोर निदर्शने केली. विठुनामाचा गजर करतानाच खोत यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांनी यातील १९ कार्यकर्त्यांवर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर धडक मारली. मात्र पोलिसांनी ३०० फूट अंतरावरच त्यांना रोखल्यामुळे, जवळपास चार तास तेथेच विठुनामाचा गजर करीत आंदोलक थांबले. खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा निषेध करण्यात आला. शंभरावर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.या वेळी बळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एफआरपी अधिक १७५ रुपयांचा तोडगा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रणच आहे. या तोडग्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३५०० रुपयांची पहिली उचल घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. आता सत्तेत सहभाग असल्यामुळे आंदोलन टाळून तोडग्याच्या नावाखाली पुन्हा त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका असून तो आम्ही हाणून पाडणार आहोत. (वार्ताहर)सदाभाऊ निघाले दौऱ्यावरमुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमालाची थेट बाजारत विक्री करण्याची व्यवस्था सुरू केल्यानंतर आता पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन राज्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. कांदा आणि इतर शेतमालाचे भाव अधुनमधून पडतात आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. पश्चिम बंगालमध्ये आणि तेथून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यापैकी ८० टक्के कांदा हा महाराष्ट्रातून जातो. या शिवाय, द्राक्षे, बेदाणे, संत्री, मोसंबी, डाळींबही मोठ्या प्रमाणात पाठविले जाते. हा शेतमाल दलालांच्या विविध टप्प्यांतून पाठविण्याऐवजी त्याला या दोन राज्यांमध्ये थेट बाजारपेठेत विक्रीला नेण्याचा विचार आता समोर आला आहे. त्या दृष्टीनेच या दोन राज्यांमध्ये जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना दिले.