शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

भार्इंदर पालिकेविरोधात निदर्शने

By admin | Updated: March 4, 2017 03:24 IST

राष्ट्रीय हरित लवादाने मीरा-भार्इंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली

भार्इंदर : राष्ट्रीय हरित लवादाने मीरा-भार्इंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली असतानाच पालिकेचा घनकचरा प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी उत्तनमधील नागरिकांनी गुरुवारी पालिकेच्या मुख्यालयात मूक निदर्शने केली. पालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेच्या दिवशीच ही निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी प्रकल्प हटवण्याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्याचे आवाहन सर्वपक्षीय सदस्यांना केले.पालिकेने २००८ मध्ये धावगी-डोंगर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा बीओटी तत्त्वावरील प्रकल्प सुरू केला. त्याला स्थानिकांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला होता. मात्र, कालांतराने प्रकल्प इतरत्र स्थलांतरित केला जाईल, या आश्वासनानंतर स्थानिकांचा विरोध काहीसा मावळला. परंतु, प्रकल्प स्थलांतरित न होता गेल्या १० वर्षांपासून तेथेच सुरू आहे. या प्रकल्पालगत राजकीय नेते व बिल्डर यांच्या संगनमतातून मोठ्याप्रमाणात बांधकामे उभारण्यात आली. त्यातच, अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेपामुळे २०१३ मध्ये प्रकल्प बंद पाडला. ३० वर्षे करारावर सुरू केलेला प्रकल्प अवघ्या पाच महिन्यांत बंद पडल्याने पालिकेने तो जमीनदोस्त केला. परिणामी, शहरात दररोज जमा होणारा सुमारे साडेचार मे.टन कचरा उघड्यावर टाकला जाऊ लागला. प्रक्रिया न होताच कचरा टाकल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्याला पालिकेकडून दाद मिळत नसल्याने स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे २०१५ मध्ये धाव घेतली. लवादाच्या पुणे खंडपीठाने पालिकेला सकवार येथील नियोजित प्रकल्पापोटी ७० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. या आदेशाला पालिकेने मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. दरम्यान, पालिकेने धावगी-डोंगर येथे टाकलेल्या कचऱ्यावर ठोस प्रक्रिया केली जात नसल्याने लवादाने पालिकेच्या अकार्यक्षमतेला फटकारत एस्क्र ो खात्यात २० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले. येत्या आठ महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाध्य केले. त्यासाठी कंत्राटदाराला एका महिन्यात कार्यादेश देण्यास पालिकेला बजावले. (प्रतिनिधी)>कचरा पाच वर्षांनी नष्ट होणारकाँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्थानिकांच्या बैठकीत मुंबई, आयआयटीमधील तज्ज्ञ झा यांनी कचऱ्यावरील प्रक्रिया करून तो नष्ट करण्याकरिता किमान पाच वर्षे लागणार असल्याचे स्पष्ट केले.पालिकेने लवादाच्या निर्देशानुसार नियुक्त केलेल्या कंत्राटदारासोबत सात वर्षांचा करार केला असून हा प्रकल्प सध्याच्या उत्तन येथील जागेत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले.