शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

भार्इंदर पालिकेविरोधात निदर्शने

By admin | Updated: March 4, 2017 03:24 IST

राष्ट्रीय हरित लवादाने मीरा-भार्इंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली

भार्इंदर : राष्ट्रीय हरित लवादाने मीरा-भार्इंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली असतानाच पालिकेचा घनकचरा प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी उत्तनमधील नागरिकांनी गुरुवारी पालिकेच्या मुख्यालयात मूक निदर्शने केली. पालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेच्या दिवशीच ही निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी प्रकल्प हटवण्याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्याचे आवाहन सर्वपक्षीय सदस्यांना केले.पालिकेने २००८ मध्ये धावगी-डोंगर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा बीओटी तत्त्वावरील प्रकल्प सुरू केला. त्याला स्थानिकांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला होता. मात्र, कालांतराने प्रकल्प इतरत्र स्थलांतरित केला जाईल, या आश्वासनानंतर स्थानिकांचा विरोध काहीसा मावळला. परंतु, प्रकल्प स्थलांतरित न होता गेल्या १० वर्षांपासून तेथेच सुरू आहे. या प्रकल्पालगत राजकीय नेते व बिल्डर यांच्या संगनमतातून मोठ्याप्रमाणात बांधकामे उभारण्यात आली. त्यातच, अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेपामुळे २०१३ मध्ये प्रकल्प बंद पाडला. ३० वर्षे करारावर सुरू केलेला प्रकल्प अवघ्या पाच महिन्यांत बंद पडल्याने पालिकेने तो जमीनदोस्त केला. परिणामी, शहरात दररोज जमा होणारा सुमारे साडेचार मे.टन कचरा उघड्यावर टाकला जाऊ लागला. प्रक्रिया न होताच कचरा टाकल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्याला पालिकेकडून दाद मिळत नसल्याने स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे २०१५ मध्ये धाव घेतली. लवादाच्या पुणे खंडपीठाने पालिकेला सकवार येथील नियोजित प्रकल्पापोटी ७० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. या आदेशाला पालिकेने मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. दरम्यान, पालिकेने धावगी-डोंगर येथे टाकलेल्या कचऱ्यावर ठोस प्रक्रिया केली जात नसल्याने लवादाने पालिकेच्या अकार्यक्षमतेला फटकारत एस्क्र ो खात्यात २० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले. येत्या आठ महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाध्य केले. त्यासाठी कंत्राटदाराला एका महिन्यात कार्यादेश देण्यास पालिकेला बजावले. (प्रतिनिधी)>कचरा पाच वर्षांनी नष्ट होणारकाँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्थानिकांच्या बैठकीत मुंबई, आयआयटीमधील तज्ज्ञ झा यांनी कचऱ्यावरील प्रक्रिया करून तो नष्ट करण्याकरिता किमान पाच वर्षे लागणार असल्याचे स्पष्ट केले.पालिकेने लवादाच्या निर्देशानुसार नियुक्त केलेल्या कंत्राटदारासोबत सात वर्षांचा करार केला असून हा प्रकल्प सध्याच्या उत्तन येथील जागेत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले.