शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपातळीवर राबविणार विहिरी पुनर्भरणाची प्रात्यक्षिके

By admin | Updated: February 15, 2016 02:07 IST

१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहात शासन विविध उपक्रम राबविणार.

अकोला: पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने निसर्गचक्र बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी व अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून राज्यात पाणीटंचाईचे संकट वाढते आहे. पाणी वापर व पाण्याचे नियोजन याबाबत जनजागृती करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे १६ ते २२ मार्च हा सप्ताह 'जलजागृती सप्ताह' म्हणून साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत गावपातळीवर विहिरी तसेच विंधन विहिरींचे पुनर्भरण यासारखी प्रात्यक्षिके जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणार आहेत.राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तथापि, जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय पाण्याचा प्रश्न मिटू शकत नाही. त्यामुळे लोकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जागृती व्हावी, यासाठी २२ मार्च या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत जलसंपदा विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग, उद्योग विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तशा सूचना जलसंपदा विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवरील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृती करण्यात येणार आहे.राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याकरिता व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत त्याची माहिती पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत तसेच जलसाक्षरता उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे उपक्रम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तालुकास्तरावर व गावपातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विहिरी पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण याची प्रात्यक्षिके ग्रामपातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे, जलयुक्त शिवार प्रकल्पांना भेटी व शिवारफेरी यांसारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.'जललेखा'संकल्पना रुजविणारया उपक्रमांतर्गत प्रत्येक गावाचा जललेखा तयार करण्यात येणार असून, त्याचे वाचन गावपातळीवर करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती नागरिकांना देऊन जनतेत जललेखा ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे. याशिवाय गावांमधील बसस्थानक, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा या सार्वजनिक ठिकाणी जलजागृतीसंदर्भातील घोषवाक्ये, भित्तिफलके लावण्यात येणार आहेत.