शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

वनहक्कासाठी अंमलबजावणी हवी

By admin | Updated: August 2, 2016 03:54 IST

२००६, २००८ आणि २०१२ या काळात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा झाल्या.

ठाणे : २००६, २००८ आणि २०१२ या काळात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. त्यानुसार आदिवासी कुटुंबियाना वनहक्क देण्यात संबंधीत खात्याकडून विलंब होतो. तो न होता अधिकाऱ्यांनी त्वरित अधिनियमाची योग्य, सुलभ अंमलबजावणी करावी, असे राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी स्पष्ट केले.वन संवर्धनासाठी उपयोगासाठी होत असेल तर वन जमिनीवरचे अतिक्र मण नियमित करता येत असल्याचेही त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.आदिवासी विभागातर्फे ठाण्यातील नियोजन भवन सभागृहात अनूसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, २००८ व सुधारणा नियम २०१२ यासंदर्भात एक दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी परिमल सिंह बोलत होते. या बैठकीस आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव, निवासी जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी के. पी. सिंग आणि खोज या संस्थेच्या कार्यकारी संचालक पोर्णिमा उपाध्याय यांच्यासह जिल्हा समन्वयक व सामूहिक वन हक्क व्यवस्थापक आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या विविध जिल्ह्यातील समन्वयक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.अध्यादेशातील सुधारणेनुसार जिल्हास्तरीय वनहक्क समिती, जिल्हास्तरीय वनहक्क समिती यांचे दावे आणि अपील यावर दिलेले निकाल हा अंतिम असून तो बंधनकारक असेल हे गृहीत धरु न प्रत्येक संबंधित खात्यांनी त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी, असे परिमल सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात तीन लाख लोकांनी वन जमिनी कसण्यासाठी मागितल्या आहेत. >वनजमिनी सुपीक करण्यावर भर हवासंबंधितांनी १५ दिवसात अशा वनजमिनी ज्यांच्याकडे आहेत, त्यांची नोंद करु न त्या सुपीक कशा होतील याकडे लक्ष द्यावे. आदिवासी किंवा जमातींचा आधार घेऊन वन जमिनी सुपीक करण्यावर भर दिला पाहिजे. वनक्षेत्र वाढण्यासाठी झाडेही लावली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आदिवासी आयुक्त राजीव जाधव साांगितले. >या जमिनींसाठी अनेक दावे प्रलंबित आहेत, ते तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. वनजमीन जर अनुसूचित जमातीचे लोक कसत असतील, तर त्यांना त्याची मालकी कशी देता येईल याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांचे हक्क दिले आणि या जमिनीत त्यांनी सुधारणा केल्या तर अन्न धान्याचा पुरवठा वाढू शकतो. >बांधबंदिस्ती करण्याबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय काय करता येईल याकडे कृषी ,महसूल व इतर खात्यांनी लक्ष देण्याचे मार्गदर्शन जाधव यांनी केले. या वेळी वनहक्क कायदा व वनविभागाचे योगदान, विभागाचा समन्वय सामूहिक वनहक्क कायदा, मेळघाट विकास आराखडा, शासनाची धोरणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.