शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शनं

By admin | Updated: April 14, 2017 13:12 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, मोदींचा ताफा दीक्षाभूमीतून निघाल्यावर घोषणा

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. मोदी यांनी दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी कोराडी येथे जात असताना पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं केली.
 
शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली.  यावेळी "अब ना चलेगा कोई बहाना, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" या घोषणांनी दीक्षाभूमीचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी नारेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे सुरेश लोलणो, शैलेंद्र हारोडे, संदीप सावरकर, अॅड.संजय नेरकर, राजीव तेलंग व फहीम अंसारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.  
 
(पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन)
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं.  शिवाय, तेथील गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवलेही होते. 
 
महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पारडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात वीज संचाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोराडी वीज प्रकल्पाची पाहणी करीत महानिर्मितीच्या कार्याचे कौतुक केले.
 
कोराडी येथील तीन संच १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये १७० मीटर उंचीचे तीन कुलिंग टॉवर असून चिमणीची उंची २७५ मीटर आहे. प्रकल्पाला ९.१ मिलियन मेट्रिक टन कोळसा आणि ६४ दलघमी पाणी प्रत्येक युनिटला लागणार आहे. यातीलन ४९.५ दलघमी पाणी नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याच्या उपक्रमाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. 
 
चंद्रपुरातील दोन वीज संचावर ७००४ कोटी खर्च करण्यात आले असून १६७ हेक्टर जागेत ते उभारण्यात आले आहे. परळीतील संचावर २०८१ कोटी रुपये खर्च करण्यात येऊन तो १३० हेक्टर जागेमध्ये आहे. 
कोराडी येथील तिन्ही संच हे जपानच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिले विद्युत संच आहे, हे विशेष! त्यामुळे उत्पादन खर्चात आणि त्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.