शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत

By admin | Updated: March 27, 2017 19:51 IST

राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 27 मार्च 2017 - राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे, हे सरकार दारूप्रेमी असल्याचं निदर्शक आहे, अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानावरती बंदी आणली . या अनुषंगाने महामार्गानजीकची सर्व बिअर बार, परमिट रूम आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला होता. दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात होऊन मृत्यूमुखी पडणा-यांची प्रचंड मोठी संख्या पाहता हा निर्णय स्वागतार्हच होता. परंतु बार आणि परमिट चालवणा-या संघटनेच्या दबावाखाली राज्य शासनाने बार आणि परमिट रूमचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतला, असं सावंत म्हणाले.
 
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड खर्च करण्यात आला, त्यामागे सदर प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूबंदीबाबत भाजपचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वल्गना करत होते. परंतू लाखो लोकांच्या जीवापेक्षा या सरकारला दारू विक्रीतून मिळणारे उत्पन्न अधिक महत्त्वाचे वाटते यासाठी सरकारने शहरातून जाणा-या महामार्गांचा दर्जा काढून घेण्याचा घाटही घातला आहे. केरळ सरकारने देशाचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून यासंदर्भात मागितलेल्या मताचा आधार घेऊन सदर परवाने पुनर्स्थापित केले जात आहेत. राज्य सरकार स्वतः देखील या संदर्भात ऍटर्नी जनरल यांचे मत मागवू शकले असते, पण यासाठी वाट पाहण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. यावरून सरकारला हा निर्णय घेण्याची किती घाई आहे, हे स्पष्ट होते. महामार्गावर दारूच्या नशेत होणारे अपघात आणि त्यामुळे अनेक कुटुंबाची होणारी वाताहत पाहून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून या निर्णयामागील उद्द्येशाचे महत्त्व अधोरेखीत होते. प्रत्येक समाजोपयोगी निर्णय न्यायालयाने घ्यावे आणि सरकारने मात्र त्यात पळवाट शोधावी,असे अतिशय दुर्देवी चित्र या सरकारने प्रस्थापित केले आहे. राज्य सरकारने पळवाट शोधून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागील उद्देशाला हरताळ फासला आहे, असे म्हणत सावंत यांनी याविरोधात काँग्रेस ठाम भूमिका घेईल असा इशारा सरकारला दिला आहे.