शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत

By admin | Updated: March 27, 2017 19:51 IST

राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 27 मार्च 2017 - राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे, हे सरकार दारूप्रेमी असल्याचं निदर्शक आहे, अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानावरती बंदी आणली . या अनुषंगाने महामार्गानजीकची सर्व बिअर बार, परमिट रूम आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला होता. दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात होऊन मृत्यूमुखी पडणा-यांची प्रचंड मोठी संख्या पाहता हा निर्णय स्वागतार्हच होता. परंतु बार आणि परमिट चालवणा-या संघटनेच्या दबावाखाली राज्य शासनाने बार आणि परमिट रूमचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतला, असं सावंत म्हणाले.
 
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड खर्च करण्यात आला, त्यामागे सदर प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूबंदीबाबत भाजपचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वल्गना करत होते. परंतू लाखो लोकांच्या जीवापेक्षा या सरकारला दारू विक्रीतून मिळणारे उत्पन्न अधिक महत्त्वाचे वाटते यासाठी सरकारने शहरातून जाणा-या महामार्गांचा दर्जा काढून घेण्याचा घाटही घातला आहे. केरळ सरकारने देशाचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून यासंदर्भात मागितलेल्या मताचा आधार घेऊन सदर परवाने पुनर्स्थापित केले जात आहेत. राज्य सरकार स्वतः देखील या संदर्भात ऍटर्नी जनरल यांचे मत मागवू शकले असते, पण यासाठी वाट पाहण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. यावरून सरकारला हा निर्णय घेण्याची किती घाई आहे, हे स्पष्ट होते. महामार्गावर दारूच्या नशेत होणारे अपघात आणि त्यामुळे अनेक कुटुंबाची होणारी वाताहत पाहून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून या निर्णयामागील उद्द्येशाचे महत्त्व अधोरेखीत होते. प्रत्येक समाजोपयोगी निर्णय न्यायालयाने घ्यावे आणि सरकारने मात्र त्यात पळवाट शोधावी,असे अतिशय दुर्देवी चित्र या सरकारने प्रस्थापित केले आहे. राज्य सरकारने पळवाट शोधून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागील उद्देशाला हरताळ फासला आहे, असे म्हणत सावंत यांनी याविरोधात काँग्रेस ठाम भूमिका घेईल असा इशारा सरकारला दिला आहे.