शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

थेट निवड लोकशाहीस पोषकच !

By admin | Updated: October 27, 2016 01:58 IST

थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी

मुंबई : थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या अध्यादेशावर स्थगिती देण्यास नकार दिला.नगराध्यक्षपदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यासंदर्भात राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी जारी केलेल्या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही, इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे न्यायालयात केली. या याचिकांवरी सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोमक यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारचा निर्णय लोकशाहीस पोषक असून, याद्वारे घोडेबाजारास आळा बसेल, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारने मेमध्ये काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुका याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात येतील, असा आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली, परंतु उच्च न्यायालयाने तसेही करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)