शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

थेट निवड लोकशाहीस पोषकच !

By admin | Updated: October 27, 2016 01:58 IST

थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी

मुंबई : थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष निवडीचे राज्य सरकारचे धोरण लोकशाहीस पोषक असल्याचे मत नोंदवत, उच्च न्यायालयाने या निवडणुकीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या अध्यादेशावर स्थगिती देण्यास नकार दिला.नगराध्यक्षपदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यासंदर्भात राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी जारी केलेल्या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही, इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे न्यायालयात केली. या याचिकांवरी सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोमक यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारचा निर्णय लोकशाहीस पोषक असून, याद्वारे घोडेबाजारास आळा बसेल, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारने मेमध्ये काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुका याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात येतील, असा आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली, परंतु उच्च न्यायालयाने तसेही करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)