शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

मोहोपाड्यात पाणीप्रश्नावर उपाययोजनेची मागणी

By admin | Updated: August 1, 2016 02:52 IST

रसायनी पाताळगंगा परिसरात ३५ ते ४० छोटेमोठे कारखाने आजही सुरू आहेत.

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरात ३५ ते ४० छोटेमोठे कारखाने आजही सुरू आहेत. २०२० पर्यंत राज्यातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी-पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राची ओळख निर्माण होणार आहे. या परिसरात जवळपास २०० कारखान्यांना मंजुरी मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यातील काही कारखान्यांचे काम सुरू झाले आहे. यामुळे पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. एमआयडीसी क्षेत्राबरोबरच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी काही गावांना पाणीसमस्येची झळ लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत मुकादम यांच्यासह एमआयडीसी अधिकारी यांची मुंबई विधानसभा सचिवालयात बैठक पार पडली. यावेळी मंत्री सुभाष देसाई, आमदार मनोहर भोईर, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते. बैठकीत पाणीप्रश्न व पाणीपट्टी थकबाकीवर चर्चा करण्यात आली. सरपंच शशिकांत मुकादम यांनी पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर, आळी आंबिवली व रिसवाडी या गावांना नवीन नळजोडणी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी एमआायडीसी अधिकाऱ्यांनी मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे ३० कोटी पाणीपट्टी थकबाकी असून, यातून निव्वळ सहा कोटी असल्याचे स्पष्ट केले. यावर सरपंच मुकादम यांनी महिना ५० हजार रुपये भरण्याची तयारी दाखविली. अखेर चर्चेअंती योग्य तोडगा न निघाल्याने निर्णय होऊ शकला नसल्याचे सरपंच शशिकांत मुकादम यांनी बोलताना सांगितले.