शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

धनगर आरक्षणासाठी आत्मदहन करणार, याचिकाकर्त्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:35 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी आता सरकारला थेट मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी आता सरकारला थेट मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. न्यायालयीन लढाईतही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत १५ मे रोजी १०० कार्यकर्त्यांसह आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून आतापर्यंत छोटी-मोठी मिळून तब्बल २२४ आंदोलने केली. अनेक वेळा पोलिसी खाकीचा वापर करून सरकारने आंदोलकांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विरोधी बाकावर असताना फक्त १५ दिवसांत आरक्षण देण्याचा दावा करणारे सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली तरी अद्याप आरक्षणाची अंमलबजावणी करू शकलेले नाहीत. याउलट सर्वपक्षीय नेत्यांकडून धनगर आरक्षणाचे राजकारणच सुरू असल्याचा आरोप पाटील यांनीकेला आहे.या आंदोलनात पाटील यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते मंत्रालयात घुसून आत्मदहन करतील, तर उरलेले कार्यकर्ते या प्रश्नावरून राज्यभरात रान पेटवतील, असे पाटील यांच्या भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने जाहीर केले.प्रत्येक अधिवेशनात आंदोलन केल्यानंतर फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळे १५ मेआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत ‘धनगड’ऐवजी धनगर शब्द झाल्याची दुरुस्ती करावी.तसेच तशी शिफारस करणारा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, असे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाटील यांनी पाठवले आहे.अन्यथा आरपारची लढाई करण्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांसह आत्मदहन करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.