शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणविषयक जनसुनावणी पुन्हा घेण्याची मागणी

By admin | Updated: July 13, 2017 03:30 IST

जनहितार्थ कार्यरत सरकारी प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सर्वत्र एकवाक्यता असणे अपेक्षित असते

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जनहितार्थ कार्यरत सरकारी प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सर्वत्र एकवाक्यता असणे अपेक्षित असते, परंतु मंगळवारी पेण येथे झालेल्या आॅरेंज स्मार्ट सिटी लि.करिता आयोजित पर्यावरणविषयक जनसुनावणीच्या निमित्ताने राज्यातील जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नियंत्रण प्रदूषण (एमपीसीबी) कडून देण्यात आलेले दस्तऐवज व अहवाल पूर्णपणे इंग्रजीमध्ये असल्याने अनेक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांना समजू न शकल्याने त्याचा अनुवाद मराठीमध्ये करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर १२ गावातील, तसेच १६ आदिवासी वाड्यातील नागरिकांना अंधारात ठेवून सध्या लावणीचा हंगाम बघून ही जनसुनावणी ठेवण्यात आल्याने ती बेकायदा ठरवून ती पुन्हा घ्यावी, अशी मागणी वैशाली पाटील यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मठ-सतये येथे सासवान मिनरल्स अ‍ॅन्ड केमिकल्स प्रा.लि. या कंपनीस वाळू उत्खनन करण्याकरिता आवश्यक पर्यावरणविषयक जनसुनावणीच्यावेळी कंपनीने ‘पर्यावरणविषयक आघात मूल्यांकन अहवाल’ स्थानिक प्रादेशिक मराठी भाषेत संबंधित बाधित गावांतील ग्रामस्थांना एक महिना अगोदर उपलब्ध करुन दिला नाही. परिणामी संभाव्य बाधित ग्रामस्थांना प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या कारणास्तव राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. भा.ना. पाटील ही पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि ही जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. तीच नेमकी परिस्थिती आणि कारणे पेण येथील आॅरेंज स्मार्ट सिटी लि.च्या जनसुनावणीबाबत होती. आणि हे सारे लेखी निवेदनाद्वारे रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांना ७ जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिले होते. तरी सुद्धा मंगळवारी पेण येथे आॅरेंज स्मार्ट सिटी लि.ची जनसुनावणी आयोजित करून रेटून नेवून पूर्ण करणे हे चुकीचे आहे. परिणामी रायगड जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत पेण तालुक्यातील संभाव्य बाधित १२ गावे आणि १६ आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांच्या मनात शंका उत्पन्न झाली असल्याचे आॅरेंज स्मार्ट सिटी बाधित संघर्ष समितीच्या प्रमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दहा वर्षांपासून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून चालू स्थितीमध्ये असलेला जमिनीचा भाव शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच त्या भावाचे पूनर्मूल्यांकन करण्यात यावे. नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होत असेल आणि स्थानिक नदीमध्ये प्रदूषण निर्माण होत असेल तर या प्रकल्पाला आमचा विरोध राहणार असल्याचे आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित या सुनावणीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. अनंत हर्षवर्धन, तहसीलदार अजय पाटणे आदींसह काही शेतकरी उपस्थित होते. हरकतींची नोंद सुनावणीच्या अहवालात करणारया सुनावणीत बळवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पोशी विठ्ठल पवार,कातकरी युवक संजय दामोदर नाईक आदींनी आक्षेपाचे मुद्दे नोंदविले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकऱ्यांना होणारे फायदे, स्थानिकांना कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून कोणतेही गाव बाधित न करता हा प्रकल्प उभारण्यात येणार असून प्रदूषणविरहित प्रकल्प होणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घेतलेल्या हरकतींची नोंद सुनावणीच्या अहवालात करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी सांगितले.