शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

फौजी शिवतर करण्याची मागणी

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

शिवतर गाव : सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष ठरणार

श्रीकांत चाळके - खेड -पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात धारातीर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणार्थ इंग्रज सरकारने उभारलेल्या रणस्तंभाची डागडुजी झाली आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निधीतून १५ लाख रूपये या कामासाठी दिले आहेत. याकरिता रामदास कदम यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आतापर्यंतच्या सर्व आमदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते. मात्र, रामदास कदम यांनीच विशेष लक्ष घालून दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत़ आता सुशोभिकरणाबरोबरच कदम यांनी दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील जवानांनी केली आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवानांनी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान केले आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात या गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांसाठी कोणतीही विकासकामे येथे झालेली नाहीत. त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण व्हावी, याकरिता शिवतर कोंडवाडी येथे बिटिश सरकारने उभारलेल्या रणस्तंभावर २३४ पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत. उर्वरित जवानांची माहिती येथील माजी सैनिकांना तसेच हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या पाल्यांना तसेच माजी सैनिकांना नाही. येथील माजी सैनिकांच्या संघटनेने मागणी करूनही ती नावे प्राप्त झाली नाहीत. गेल्या तेरा वर्षांपासून याकरिता संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यात येत आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक वर्षे झालेल्या या रणस्तंभाची दुर्दशा झाली होती. अखेर रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन या स्तंभाची डागडुजी केली आहे. त्याकाळी २१ रूपये पगारावर काम करणारे आणि ब्रिटिश सरकारमध्ये चाकरी करूनही मातृभूमीशी कोणतीही तडजोड न करणारे लाडकोजीराव मोरे आजही शिवतर गावात देशाची शान बनून राहिले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात अनेक कुटुबं उद्ध्वस्त झालेल्या शिवतर गावाचा ‘मर्दुमकी गाजवणाऱ्या सैनिकांचा गाव’ म्हणून भारत सरकारकडून गौरव करण्यात आला. हेच गाव आज विशेष सुविधांपासून अद्याप वंचित आहे.़ राजकीयदृष्ट्या सर्वच पक्षांकडून या गावाला सातत्याने कमी महत्व दिले गेले़ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करावे.आंबवडे गावाप्रमाणे भारत सरकारकडून शिवतर गावालाही माजी सैनिकांसाठी द्यावयाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. सैनिकी गावाचा विकास खऱ्या अर्थाने त्याचवेळी होणार आहे. याकरिता रामदास कदम यांनी लक्ष घालावे, अशी मागणी येथील जवांनानी केली आहे.रणस्तंभाची डागडुजी खासदारांच्या निधीतून.कदम यांचे प्रयत्न.दुर्लक्षित शिवतरला फौजी शिवतर करण्यासाठी प्रयत्न.दिवंगत सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याची माजी सैनिकांची मागणी.जवानांचे गाव म्हणून प्रसिध्द.