शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

फौजी शिवतर करण्याची मागणी

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

शिवतर गाव : सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष ठरणार

श्रीकांत चाळके - खेड -पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात धारातीर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणार्थ इंग्रज सरकारने उभारलेल्या रणस्तंभाची डागडुजी झाली आहे़ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निधीतून १५ लाख रूपये या कामासाठी दिले आहेत. याकरिता रामदास कदम यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आतापर्यंतच्या सर्व आमदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते. मात्र, रामदास कदम यांनीच विशेष लक्ष घालून दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत़ आता सुशोभिकरणाबरोबरच कदम यांनी दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील जवानांनी केली आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवानांनी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान केले आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात या गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांसाठी कोणतीही विकासकामे येथे झालेली नाहीत. त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण व्हावी, याकरिता शिवतर कोंडवाडी येथे बिटिश सरकारने उभारलेल्या रणस्तंभावर २३४ पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत. उर्वरित जवानांची माहिती येथील माजी सैनिकांना तसेच हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या पाल्यांना तसेच माजी सैनिकांना नाही. येथील माजी सैनिकांच्या संघटनेने मागणी करूनही ती नावे प्राप्त झाली नाहीत. गेल्या तेरा वर्षांपासून याकरिता संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यात येत आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक वर्षे झालेल्या या रणस्तंभाची दुर्दशा झाली होती. अखेर रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन या स्तंभाची डागडुजी केली आहे. त्याकाळी २१ रूपये पगारावर काम करणारे आणि ब्रिटिश सरकारमध्ये चाकरी करूनही मातृभूमीशी कोणतीही तडजोड न करणारे लाडकोजीराव मोरे आजही शिवतर गावात देशाची शान बनून राहिले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात अनेक कुटुबं उद्ध्वस्त झालेल्या शिवतर गावाचा ‘मर्दुमकी गाजवणाऱ्या सैनिकांचा गाव’ म्हणून भारत सरकारकडून गौरव करण्यात आला. हेच गाव आज विशेष सुविधांपासून अद्याप वंचित आहे.़ राजकीयदृष्ट्या सर्वच पक्षांकडून या गावाला सातत्याने कमी महत्व दिले गेले़ रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करावे.आंबवडे गावाप्रमाणे भारत सरकारकडून शिवतर गावालाही माजी सैनिकांसाठी द्यावयाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. सैनिकी गावाचा विकास खऱ्या अर्थाने त्याचवेळी होणार आहे. याकरिता रामदास कदम यांनी लक्ष घालावे, अशी मागणी येथील जवांनानी केली आहे.रणस्तंभाची डागडुजी खासदारांच्या निधीतून.कदम यांचे प्रयत्न.दुर्लक्षित शिवतरला फौजी शिवतर करण्यासाठी प्रयत्न.दिवंगत सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याची माजी सैनिकांची मागणी.जवानांचे गाव म्हणून प्रसिध्द.