शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्थलांतरितांसाठी श्रमिक ट्रेनची मागणी प्रलंबित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 06:22 IST

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती; गरज भासल्यास व्यवस्था करण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्थलांतरितांसाठी श्रमिक विशेष ट्रेनची मागणी प्रलंबित नाही. तशी गरज भासल्यास ट्रेनची व्यवस्था करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरितांचे हाल होत असल्याची चिंता व्यक्त करीत सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनच्या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, ज्या स्थलांतरितांनी श्रमिक ट्रेनने किंवा बसने त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे, त्यांना त्यांच्या प्रलंबित अर्जाबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यांना अस्वच्छ व घाणेरड्या निवासस्थानात अन्न व आवश्यक वस्तूंशिवाय राहावे लागत आहे.या याचिकेवर सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करीत सर्व आरोप फेटाळले. १ जूनपर्यंत ८२२ ट्रेन ११,८७,१५० स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात घेऊन गेल्या, असे नमूद केले. ‘श्रमिक विशेष ट्रेनपैकी एक ट्रेनच बाकी आहे. ही ट्रेन मणिपूरहून सुटेल. याव्यतिरिक्त आणखी विशेष ट्रेन  स्थलांतरितांसाठी सोडण्याची मागणी प्रलंबित नाही,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.अन्य ट्रेन सुरू झाल्याने स्थलांतरित मजूर व अडकलेक्या प्रवाशांना श्रमिक ट्रेनवर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. स्थलांतरितांकडून प्रवासाचे भाडे आकारण्यात येत नाही. हा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून करण्यात येत आहे, असे सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.पुढील सुनावणी ९ जूनलाप्रतिज्ञापत्रानुसार, १० एप्रिलपर्यंत ५,४२७ साहाय्यता कॅम्प उभारले. त्यात ६,६६,९९४ स्थलांतरित राहिले. तर ३१ मेपर्यंत या कॅम्पमध्ये ३७,९९४ स्थलांतरितांनी आश्रय घेतला. याचाच अर्थ बहुतांशी अडकलेले स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ९ जून रोजी ठेवली आहे.