मुंबई : भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही. मात्र त्यांचे विधान हे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्याबाबत सरकारने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेचे राज्य अध्यक्ष तौफिक अस्लम शेख यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या संस्थेने राज्यभर 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान जनजागृत कार्यक्रम करून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या ध्येयधोरणाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तौफीक शेख म्हणाले, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील महत्तवाचे प्रश्न, समस्या आहेत याबाबत सव्रेक्षण केले असून त्याबाबत जागरुकता आणण्यासाठी राज्यभरात दौरा काढून माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी
By admin | Updated: August 19, 2014 01:04 IST