शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: April 2, 2015 04:55 IST

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते

मुंबई : मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत (डीपी) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने तो रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुंबईतील चांगले आर्किटेक्ट बोलावून नवा आराखडा तयार करा, असे ते म्हणाले. तर भाजपाचे आशीष शेलार आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी प्रस्तावित आराखडा मराठीत प्रसिद्ध करून त्यानंतर दोन महिन्याच्या आत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवा, अशी जोरदार मागणी केली. बाहेर टीकेचा विषय झालेला हा आराखडा विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या रोषाचा विषय ठरला. मुंबईच्या विकासासंदर्भात नियम २९३ नुसार सभागृहात चर्चा झाली. त्यावेळी भुजबळ यांनी एकामागून एक एफएसआय वाढवून देण्याने श्रीमंताचे भले होईल पण मुंबई मृत्यूपंथाला लागेल, असा इशारा दिला. शेलार म्हणाले की, हा आराखडा तयार करण्याचे काम एससीई या फ्रेंच कंपनीला देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष हे काम ईजीस जिओ प्लॅन या कंपनीने केले. विकास आराखड्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे. या आराखड्यात मुंबईचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण असावे अशी कार्यकक्षा महापालिकेच्या स्थायी समितीने ठरवून दिली होती. पण तसे कुठेही दिसत नाही असे ते म्हणाले.यावेळी जयंत पाटील, मंगलप्रभात लोढा, सदा सरवणकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, वारिस पठाण, भारती लव्हेकर, सुनील शिंदे, धैर्यशील पाटील, रमेश लटके, अमित साटम, पराग अळवणी, अबू आझमी यांनी या चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)