शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 19, 2016 02:06 IST

राज्याचे बजेट पाहता प्रथमदर्शनी अपेक्षेप्रमाणेच केंद्रीय बजेटचा परिणाम दाखविणारे ते दिसते. देशात मागील तीन-चार वर्षांतील लहरी हवामान आणि काही भागांतील सततच्या

- श्रीकांत तराळराज्याचे बजेट पाहता प्रथमदर्शनी अपेक्षेप्रमाणेच केंद्रीय बजेटचा परिणाम दाखविणारे ते दिसते. देशात मागील तीन-चार वर्षांतील लहरी हवामान आणि काही भागांतील सततच्या दुष्काळाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले. केंद्राच्या अर्थसंकल्पात त्याचे पडसाद दिसून आलेत. सन २००६ मध्ये प्रो. स्वामिनाथन यांच्या ‘किसान आयोगाच्या’ शिफारशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून दिलासा देण्याकरिता करण्यात आल्या होत्या. या आयोगाकडेसुद्धा केंद्र सरकारने पहिल्यांदाच डोळसपणे पाहून बजेटमध्ये योग्य स्थान दिले. त्यामुळेच केंद्रीय बजेट शेतकरीभिमुख होऊ शकले. राज्याच्या बजेटबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा म्हणूनच वाढल्या होत्या. सर्व स्तरांतून तशा अपेक्षाही व्यक्त झाल्या होत्या. राज्याच्या बजेटची आखणी करताना शेतकऱ्यांसंबंधीच्या या मुद्द्यांची मदतच झालेली दिसते. पूर्वी कल्याणकारी योजना आणि विस्कळीत अंमलबजावणी, असे चित्र आणि दृष्टिकोन होता. राज्याच्या या बजेटमध्ये यात मूलभूत सुधारणा आणि बदल केल्याचे तसेच आता थोडे शहाणपण आल्याचे दाखविले आहे. ग्रामीण भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पायाभूत उभारणी आणि सुधारणा अशा स्वरूपाचा ठरविला आहे. त्याकरिता सूक्ष्म नियंत्रण, कृषी गुरुकुल, प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्सव, सेंद्रिय शेतीचा दर्जेदार वापर, शेतरस्ते, पाणंद रस्ते याकरिता १०० कोटी रुपये तेसुद्धा ग्रामीण युवकांना प्राधान्याने कामे देऊन, हवामान केंद्र, अचूक अंदाज, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पैशांचा ओघ वाढविण्याचा प्रयत्न, हा शेतकऱ्यांच्या शेतबाह्य रोजगारातून पैसा मिळविण्याचा मार्ग अभिनंदनीय ठरावा. सरकार नाव घेत नसले तरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी डोळसपणे उपयोगात आणल्या जात आहेत, याचे समाधान आहे. (लेखक कृृषी अभ्यासक आहेत.)- शेतकऱ्यांचे वाढलेले कर्ज हे शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे. तो शेतकऱ्यांनी केलेला गुन्हा नव्हे. म्हणून कर्जमाफी की कर्जमुक्ती, हा राजकीय वाद जरी बाजूला ठेवला तरी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर बजेटमध्ये मिळालेले नाही. तरीसुद्धा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दिशेने उचललेल्या पावलावर पाऊल टाकण्याचा चांगला प्रयत्न टंचाईग्रस्त राज्य सरकारने केला, असे म्हणता येईल.