शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

केवळ २८ टक्के निधी वितरीत

By admin | Updated: February 23, 2015 05:09 IST

आर्थिक वर्ष संपण्याला महिन्याभराचा अवधी उरला असताना राज्य सरकारने अल्पसंख्याक विकास विभागासाठी केलेल्या मंजूर निधीपैकी आतापर्यत जेमतेम

जमीर काझी, मुंबईआर्थिक वर्ष संपण्याला महिन्याभराचा अवधी उरला असताना राज्य सरकारने अल्पसंख्याक विकास विभागासाठी केलेल्या मंजूर निधीपैकी आतापर्यत जेमतेम २८ टक्के निधी वितरित केला आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या हिश्शापैकी आतापर्यंत एकाही रुपयाचे वाटप झालेले नाही. राज्य व केंद्राचा मिळून अद्याप २४५ कोटींवर निधी वापराविना पडून आहे.अल्पसंख्याक विभागातील विविध २५ योजनांपैकी तब्बल १३ योजनांमध्ये जवळपास १६० कोटींच्या निधीची तरतूद असूनही त्यातील एक रुपयाचेही वाटप करण्यात आलेले नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मंजूर ३४३.३५ कोटींपैकी गेल्या साडे दहा महिन्यांत प्रत्यक्षात केवळ ९७.८४ कोटी वापरात आणले आहेत. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत तब्बल २४५.५१ कोटी निधीचे वाटप करण्याचे अशक्यप्राय आव्हान राज्य सरकारपुढे आहे. त्यामुळे विभागाचा बहुतांश निधी वापराविना शिलकीत ठेवला जाईल किंवा अन्य विभागाकडे वर्ग केला जाण्याची भीती जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने आपल्या हक्काची मतपेटी समजल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील अल्पसंख्याक विकास विभागासाठी एकूण ३७७.४५ कोटींचा निधी मंजूर केला होता. प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये त्यातील १० टक्के निधी वजा करीत ३४३.३५ कोटींची मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये केंद्राचा हिस्सा १५ कोटी ४० लाख होता. राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध २५ योजनांतर्गत हा निधी लाभार्थी संस्था व विकासकामांवर खर्च करावयाचा आहे. मात्र एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आचारसंहितेमुळे या योजनांकडे दुर्लक्ष झाले. दोन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे केंद्र व राज्यात सत्तांतर होऊन भाजपाचे सरकार सत्तेत आले. त्यानंतरही विभागाच्या निधी वाटपाची गती मंदावली आहे. जानेवारी अखेरपर्यंत विभागाकडून एकूण ९७.८४ कोटींचे अनुदान वितरित झालेला असून, अद्याप २४५ कोटींचा निधी पडून आहे. त्यामुळे ३१ मार्चअखेरपर्यंत त्यापैकी निम्मीदेखील रक्कम वापरली जाईल की नाही, याबाबत जाणकरांकडून साशंकता वर्तविली जात आहे.