शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिल्लीने दिला युतीचा कौल?

By admin | Updated: March 1, 2017 06:42 IST

भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले.

नवी दिल्ली /मुंबई : महाराष्ट्रातील १0 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत अभिनंदन केले. तब्बल दीड तास झालेल्या चर्चेमध्ये आता निवडणुका संपल्यामुळे शिवसेनेशी पुन्हा संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते.गेली २५ वर्षे आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांची मदत घेतल्यास आपली कायमस्वरूपी अडचण होईल आणि ती होणे योग्य नाही, अशी दिल्लीतील भाजपा नेत्यांची भूमिका आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हेही दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र यायला हवे, या मताचे आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपा यांच्यातील संबंध सुधारण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू होण्याची चर्चा आहे. पुन्हा एकत्र येताना मुंबई महापालिकेत भाजपाला अगदीच दुय्यम भूमिका मिळता कामा नये आणि काही महत्त्वाच्या समित्यांची अध्यक्षपदे तसेच अडीच वर्षे महापौरपद आपल्याला मिळावे, अशी भाजपामधील अनेकांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या चर्चेत राज्यात भाजपची सुधारलेली कामगिरी आणि मुंबईचे महापौरपद हे प्रमुख मुद्दे होते. मात्र शिवसेनेच्या धमक्या आणि त्यातून आलेली कटुता यांवर अधिक विचारविनिमय झाल्याचे समजते. याच वर्षी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका यांमुळे आपण या घडीला कोणत्याही मित्रपक्षाशी संबंध तोडू नयेत, किंबहुना असलेली कटुता दूर करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येते.शिवसेनेची आक्रस्ताळी भाषा, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे इशारे आणि राज्यातील सेनेच्या काही मंत्र्यांचा मनमानीपणा याची माहिती फडणवीस यांनी बैठकीत मोदी यांना दिल्याचे बोलले जाते. मात्र हे खरे असले तरी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणि महाराष्ट्रात युतीमध्ये असलेल्या भाजपशी संबंध बिघडवण्याची ही वेळ नाही, असे मोदी म्हणाले, असे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौननिवडणुकांच्या आधी आणि त्या काळात शिवसेना व भाजपा यांच्यात निर्माण झालेली कटुता संपवून, पुन्हा संबंध सुधारणे गरजेचे आहे. मात्र तसे करताना आपण झुकता कामा नये, असे मोदी यांनी फडणवीस यांना सुचवल्याचे कळते. या बैठकीबाबत फडणवीस यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यांची पंतप्रधानांशी झालेली चर्चा प्रामुख्याने शिवसेनेशी यापुढे कसे संबंध असावेत, यावर झाल्याचे कळते. >दोघे घेणार पुढाकार? : भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यासाठी पुढाकार घेतील, असा अंदाज आहे. या दोघांनी याआधीही अनेकदा दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका जाहीरपणे घेतली आहे. मात्र शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे गरजेचे आहे.