शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युला मुंबईत नाही : मुख्यमंत्री

By admin | Updated: January 13, 2016 04:24 IST

वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याने दिल्लीत वाहनांसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला राबवण्यात आला. मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याने दिल्लीत वाहनांसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला राबवण्यात आला. मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुंबईतील एनसीपीए येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, पोलीस आयुक्त अहमद जावेद, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) गौतम चॅटर्जी, वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत वाहनांची संख्या कमी आहे. मुंबईत जवळपास २५ लाख वाहने धावतात. दिल्लीत यापेक्षा तिप्पट वाहने धावतात. वाहनांची संख्या आणि सध्या उपलब्ध असलेली पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था पाहता सम-विषम फॉर्म्युला मुंबईसाठी आवश्यक नाही. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्टसारखी व्यवस्था अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नही केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत वाहनांसाठी फॉर्म्युला लागू केल्यानंतर सध्या नवीनच उद्योग सुरू झाल्याचे सांगत सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सम-विषम नंबरच्या प्लेट वाहनांसाठी वापरल्या जात असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दंडाची रक्कम वाढणारनियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सध्या दंड ठोठावला जातो. हा दंड फार कमी असून त्यात वाढ होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत केंद्र सरकारकडे विधेयक असून ते लवकरच मंजूर होईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि दंडही चांगला मिळू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आॅक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही बसणाररस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियमांच्या पालनाचा विचार पुढे नेला पाहिजे. नियमांचे बंधन वाहनचालकांना घातल्यास अपघात होणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी सांगितले. ९५0 कोटी रुपये खर्च करून मुंबईत आॅक्टोबरपर्यंत ६,२00 सीसीटीव्ही बसविणार असल्याचेही ते म्हणाले.