शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 20, 2016 02:15 IST

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘लॉटरी सिस्टम’मुळे ही समस्या निर्माण झाली असून, यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.नागरिकांच्या घरी जात कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे हे दत्तक वस्ती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. १९९७ साली हे काम बोरीवलीमधील काजुपाडा परिसरात असलेल्या ‘आदर्श नागरीक सेवा संस्थे’ मार्फत सुरु झाले. ज्या संस्थेला १९९७ मध्ये ‘बेस्ट वर्कर अ‍ॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले होते. या अंतर्गत स्थानिकांना माफक किंमत आकारून कचरा गोळा करण्याचे काम केले जात होते. या कामातून गोळा झालेल्या रक्कमेतुन कचरावेचकांना विम्याची सुविधा दिली जात होती, असे संस्थेचे प्रमुख अभय चौबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याच कामाकडे पाहून महापालिकेने दत्तक वस्ती योजना सुरु केली, असा दावाही चौबे यांनी केला. मात्र यात कामगारांना काहीच सुविधा देण्यात आली नाही. शिवाय कमी मोबदल्यात चौपट काम करून घेण्याकडे कल वाढला. परिणामी कामाचा दर्जा घसरला, असेही त्यांनी सांगितले. >तीन वेळा निघाल्या जाहिरातीपहिली जाहिरात : दत्तक वस्ती योजनेत संस्थेची निवड करण्यासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असणे बंधनकारक होते.दुसरी जाहिरात : दुसऱ्या वेळच्या जाहिरातीत बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले. आणि यावेळी सुरुवातीच्या अटी तशाच ठेवत संस्थेच्या नोंदणीकृतसंबंधीची अटल शिथिल करण्यात आली.तिसरी जाहिरात : तिसऱ्यांदा पालिकेने ‘लॉटरी’ पद्धत सुरु केली. यात नोंदणी असलेल्या नसलेल्या, तसेच मनुष्यबळ किंवा आर्थिकदृष्टया सक्षम आणि अक्षम असलेल्या सर्वच संस्थांना अर्ज करण्याची परवानगी होती. त्यामुळे लॉटरीमध्ये ज्या संस्थेचे नाव येईल; त्या संस्थेला कंत्राट मिळू लागले. मात्र या पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरला. कारण लॉटरीमुळे पुरेसे मनुष्यबळ व आर्थिकदृष्ट सक्षम नसलेल्या मात्र तरीही कंत्राट मिळालेल्या संस्थाचा समावेश अधिक होत होता. शिवाय अनुभवी आणि सक्षम संस्था यातुन बाहेर पडल्या होत्या.>सहाऐवजी तीन महिनेच कामदत्तक वस्ती योजनेमध्ये दर सहा महिन्यांनी लॉटरी काढण्यात येत असल्याने अप्रशिक्षित लोकांना काम समजून घेण्यात आणि विभागाची माहिती मिळविण्यात तीन ते चार महिने जातात. मात्र काम समजल्यानंतरही लॉटरी पद्धतीत पुढे आपल्याला काम मिळेल की नाही? याची शाशवती नसल्याने या संस्थेचे कंत्राटदार दोन ते तीन महिने आधीच काम बंद करतात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.>उपाययोजनामुंबई २२७ वॉर्ड असुन प्रत्येक वॉर्डमध्ये कमीतकमी चार ते पाच दत्तक वस्ती संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रशिक्षित आणि अनुभवी संस्थाना लॉटरीमध्ये न टाकता त्यांना कामाची मोकळीक देणे. नवीन संस्थांची लॉटरीमार्फत निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे.लॉटरीची मुदत वाढविणे जेणेकरून नवीन संस्थाना काम करण्यास वेळ मिळेल.उत्तम काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे.