शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 20, 2016 02:15 IST

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘लॉटरी सिस्टम’मुळे ही समस्या निर्माण झाली असून, यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.नागरिकांच्या घरी जात कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे हे दत्तक वस्ती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. १९९७ साली हे काम बोरीवलीमधील काजुपाडा परिसरात असलेल्या ‘आदर्श नागरीक सेवा संस्थे’ मार्फत सुरु झाले. ज्या संस्थेला १९९७ मध्ये ‘बेस्ट वर्कर अ‍ॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले होते. या अंतर्गत स्थानिकांना माफक किंमत आकारून कचरा गोळा करण्याचे काम केले जात होते. या कामातून गोळा झालेल्या रक्कमेतुन कचरावेचकांना विम्याची सुविधा दिली जात होती, असे संस्थेचे प्रमुख अभय चौबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याच कामाकडे पाहून महापालिकेने दत्तक वस्ती योजना सुरु केली, असा दावाही चौबे यांनी केला. मात्र यात कामगारांना काहीच सुविधा देण्यात आली नाही. शिवाय कमी मोबदल्यात चौपट काम करून घेण्याकडे कल वाढला. परिणामी कामाचा दर्जा घसरला, असेही त्यांनी सांगितले. >तीन वेळा निघाल्या जाहिरातीपहिली जाहिरात : दत्तक वस्ती योजनेत संस्थेची निवड करण्यासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असणे बंधनकारक होते.दुसरी जाहिरात : दुसऱ्या वेळच्या जाहिरातीत बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले. आणि यावेळी सुरुवातीच्या अटी तशाच ठेवत संस्थेच्या नोंदणीकृतसंबंधीची अटल शिथिल करण्यात आली.तिसरी जाहिरात : तिसऱ्यांदा पालिकेने ‘लॉटरी’ पद्धत सुरु केली. यात नोंदणी असलेल्या नसलेल्या, तसेच मनुष्यबळ किंवा आर्थिकदृष्टया सक्षम आणि अक्षम असलेल्या सर्वच संस्थांना अर्ज करण्याची परवानगी होती. त्यामुळे लॉटरीमध्ये ज्या संस्थेचे नाव येईल; त्या संस्थेला कंत्राट मिळू लागले. मात्र या पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरला. कारण लॉटरीमुळे पुरेसे मनुष्यबळ व आर्थिकदृष्ट सक्षम नसलेल्या मात्र तरीही कंत्राट मिळालेल्या संस्थाचा समावेश अधिक होत होता. शिवाय अनुभवी आणि सक्षम संस्था यातुन बाहेर पडल्या होत्या.>सहाऐवजी तीन महिनेच कामदत्तक वस्ती योजनेमध्ये दर सहा महिन्यांनी लॉटरी काढण्यात येत असल्याने अप्रशिक्षित लोकांना काम समजून घेण्यात आणि विभागाची माहिती मिळविण्यात तीन ते चार महिने जातात. मात्र काम समजल्यानंतरही लॉटरी पद्धतीत पुढे आपल्याला काम मिळेल की नाही? याची शाशवती नसल्याने या संस्थेचे कंत्राटदार दोन ते तीन महिने आधीच काम बंद करतात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.>उपाययोजनामुंबई २२७ वॉर्ड असुन प्रत्येक वॉर्डमध्ये कमीतकमी चार ते पाच दत्तक वस्ती संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रशिक्षित आणि अनुभवी संस्थाना लॉटरीमध्ये न टाकता त्यांना कामाची मोकळीक देणे. नवीन संस्थांची लॉटरीमार्फत निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे.लॉटरीची मुदत वाढविणे जेणेकरून नवीन संस्थाना काम करण्यास वेळ मिळेल.उत्तम काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे.