शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 20, 2016 02:15 IST

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘लॉटरी सिस्टम’मुळे ही समस्या निर्माण झाली असून, यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.नागरिकांच्या घरी जात कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे हे दत्तक वस्ती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. १९९७ साली हे काम बोरीवलीमधील काजुपाडा परिसरात असलेल्या ‘आदर्श नागरीक सेवा संस्थे’ मार्फत सुरु झाले. ज्या संस्थेला १९९७ मध्ये ‘बेस्ट वर्कर अ‍ॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले होते. या अंतर्गत स्थानिकांना माफक किंमत आकारून कचरा गोळा करण्याचे काम केले जात होते. या कामातून गोळा झालेल्या रक्कमेतुन कचरावेचकांना विम्याची सुविधा दिली जात होती, असे संस्थेचे प्रमुख अभय चौबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याच कामाकडे पाहून महापालिकेने दत्तक वस्ती योजना सुरु केली, असा दावाही चौबे यांनी केला. मात्र यात कामगारांना काहीच सुविधा देण्यात आली नाही. शिवाय कमी मोबदल्यात चौपट काम करून घेण्याकडे कल वाढला. परिणामी कामाचा दर्जा घसरला, असेही त्यांनी सांगितले. >तीन वेळा निघाल्या जाहिरातीपहिली जाहिरात : दत्तक वस्ती योजनेत संस्थेची निवड करण्यासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असणे बंधनकारक होते.दुसरी जाहिरात : दुसऱ्या वेळच्या जाहिरातीत बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले. आणि यावेळी सुरुवातीच्या अटी तशाच ठेवत संस्थेच्या नोंदणीकृतसंबंधीची अटल शिथिल करण्यात आली.तिसरी जाहिरात : तिसऱ्यांदा पालिकेने ‘लॉटरी’ पद्धत सुरु केली. यात नोंदणी असलेल्या नसलेल्या, तसेच मनुष्यबळ किंवा आर्थिकदृष्टया सक्षम आणि अक्षम असलेल्या सर्वच संस्थांना अर्ज करण्याची परवानगी होती. त्यामुळे लॉटरीमध्ये ज्या संस्थेचे नाव येईल; त्या संस्थेला कंत्राट मिळू लागले. मात्र या पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरला. कारण लॉटरीमुळे पुरेसे मनुष्यबळ व आर्थिकदृष्ट सक्षम नसलेल्या मात्र तरीही कंत्राट मिळालेल्या संस्थाचा समावेश अधिक होत होता. शिवाय अनुभवी आणि सक्षम संस्था यातुन बाहेर पडल्या होत्या.>सहाऐवजी तीन महिनेच कामदत्तक वस्ती योजनेमध्ये दर सहा महिन्यांनी लॉटरी काढण्यात येत असल्याने अप्रशिक्षित लोकांना काम समजून घेण्यात आणि विभागाची माहिती मिळविण्यात तीन ते चार महिने जातात. मात्र काम समजल्यानंतरही लॉटरी पद्धतीत पुढे आपल्याला काम मिळेल की नाही? याची शाशवती नसल्याने या संस्थेचे कंत्राटदार दोन ते तीन महिने आधीच काम बंद करतात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.>उपाययोजनामुंबई २२७ वॉर्ड असुन प्रत्येक वॉर्डमध्ये कमीतकमी चार ते पाच दत्तक वस्ती संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रशिक्षित आणि अनुभवी संस्थाना लॉटरीमध्ये न टाकता त्यांना कामाची मोकळीक देणे. नवीन संस्थांची लॉटरीमार्फत निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे.लॉटरीची मुदत वाढविणे जेणेकरून नवीन संस्थाना काम करण्यास वेळ मिळेल.उत्तम काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे.