शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

वनजमिनींवरचा ‘कब्जा’ हटविणे हा भुलभुलैया

By admin | Updated: January 7, 2017 01:14 IST

जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात ही अतिक्रमणे हटविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापूर्वीही अशी अनेकदा आश्वासने देऊन कारवाई न झाल्याने हा भुलभुलैया सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश शासन देत आहे, मात्र मागील काही वर्षांपासून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वनजमिनींमध्ये लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केले आहे. येथील शेकडो हेक्टर क्षेत्रातील वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. या आंदोलकांना शासनाने मोकळ्या जमिनी नक्कीच द्याव्यात पण आंदोलकांकडून होत असलेली बेसुमार वृक्षतोड, तत्काळ थांबवावी. जिल्हाधिकारी, महसूलविभाग, वनविभाग, पालकमंत्री यांना निवेदन देऊनही वृक्षतोड थांबविण्याबाबत शासन व प्रशासन गप्प का..? असा सवाल खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जुन्नर, खेड, मावळ, भागातील बिबट्यांचा दौैंड, बारामती व इंदापूर या भागात प्रादुर्भाव वाढला आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात वनजमिनींवर लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केल्याचा मुद्दा दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाअखेरपर्यंत ही अतिक्रमणे हटविण्यात येतील असे आश्वासन या वेळी दिले होते.सन २०१३ पासून लोकशासनाने आंदोलक जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील ठिकठिकाणच्या वनजमिनींमध्ये ठाण मांडून बसले आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, येडगाव, कांदळी नगदवाडी, पिंपरीपेंढार, नेतवड आदी गावांमध्ये या आंदोलकांकडून वनजमिनींवर ताबा घालण्यात आला आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा पाईपलाईन नेण्यासाठी वनविभागाकडून २-२ वर्षे परवानगी दिली जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर परवानगीशिवाय पाईपलाईन नेली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. मग आता नष्ट होत असलेल्या वनसंपदेकडे शासन व प्रशासन डोळेझाक का करत आहे.(वार्ताहर)>आंदोलकांची दहशतवनजमिनीत हे आंदोलक वास्तव्य करीत आहेत. त्यात भिल्ल, ठाकर, कातकरी आदी जमातीचे लोक आहेत. त्या परिसरात कोणी ग्रामस्थ किंंवा प्रशासकीय अधिकारी गेल्यास ते दगड, भाले, गोफणीतून हल्ला करीत असल्याने तेथे कोणी जात नाही. त्यांची या परिसरात दहशत असल्याचे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले.या आंदोलकांनी अनेक ठिकाणी वृक्षतोड करून नांगरणी करून प्लॉट तयार केले आहेत. वीज चोरून वापरली जात आहे. वीज वितरणकडून देखील कोणतीच कारवाई केली जात नाही.ग्रामस्थांनी ज्या वनांचे मोठ्या आस्थेने संरक्षण केले आहे तीच वने आता डोळ्यांसमोर नष्ट होऊ लागली आहे. त्यातच बिबट्यांचा रहिवासही नष्ट होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातो़वन विभागाकडून फक्त कारवाईचा फार्स केला जातो पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणे कारवाई केली जात नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच या आंदोलकांना छुपा पाठींबा दिला जात असल्याचा आरोपही खंडागळे यांनी केला आहे. मी यापूर्वी अनेकदा हा विषय वेगवेगळ््या व्यासपीठावर मांडला. मात्र कोण दखलच घेत नाही.