शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वनजमिनींवरचा ‘कब्जा’ हटविणे हा भुलभुलैया

By admin | Updated: January 7, 2017 01:14 IST

जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात ही अतिक्रमणे हटविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापूर्वीही अशी अनेकदा आश्वासने देऊन कारवाई न झाल्याने हा भुलभुलैया सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश शासन देत आहे, मात्र मागील काही वर्षांपासून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वनजमिनींमध्ये लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केले आहे. येथील शेकडो हेक्टर क्षेत्रातील वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. या आंदोलकांना शासनाने मोकळ्या जमिनी नक्कीच द्याव्यात पण आंदोलकांकडून होत असलेली बेसुमार वृक्षतोड, तत्काळ थांबवावी. जिल्हाधिकारी, महसूलविभाग, वनविभाग, पालकमंत्री यांना निवेदन देऊनही वृक्षतोड थांबविण्याबाबत शासन व प्रशासन गप्प का..? असा सवाल खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जुन्नर, खेड, मावळ, भागातील बिबट्यांचा दौैंड, बारामती व इंदापूर या भागात प्रादुर्भाव वाढला आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात वनजमिनींवर लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केल्याचा मुद्दा दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाअखेरपर्यंत ही अतिक्रमणे हटविण्यात येतील असे आश्वासन या वेळी दिले होते.सन २०१३ पासून लोकशासनाने आंदोलक जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील ठिकठिकाणच्या वनजमिनींमध्ये ठाण मांडून बसले आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, येडगाव, कांदळी नगदवाडी, पिंपरीपेंढार, नेतवड आदी गावांमध्ये या आंदोलकांकडून वनजमिनींवर ताबा घालण्यात आला आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा पाईपलाईन नेण्यासाठी वनविभागाकडून २-२ वर्षे परवानगी दिली जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर परवानगीशिवाय पाईपलाईन नेली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. मग आता नष्ट होत असलेल्या वनसंपदेकडे शासन व प्रशासन डोळेझाक का करत आहे.(वार्ताहर)>आंदोलकांची दहशतवनजमिनीत हे आंदोलक वास्तव्य करीत आहेत. त्यात भिल्ल, ठाकर, कातकरी आदी जमातीचे लोक आहेत. त्या परिसरात कोणी ग्रामस्थ किंंवा प्रशासकीय अधिकारी गेल्यास ते दगड, भाले, गोफणीतून हल्ला करीत असल्याने तेथे कोणी जात नाही. त्यांची या परिसरात दहशत असल्याचे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले.या आंदोलकांनी अनेक ठिकाणी वृक्षतोड करून नांगरणी करून प्लॉट तयार केले आहेत. वीज चोरून वापरली जात आहे. वीज वितरणकडून देखील कोणतीच कारवाई केली जात नाही.ग्रामस्थांनी ज्या वनांचे मोठ्या आस्थेने संरक्षण केले आहे तीच वने आता डोळ्यांसमोर नष्ट होऊ लागली आहे. त्यातच बिबट्यांचा रहिवासही नष्ट होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातो़वन विभागाकडून फक्त कारवाईचा फार्स केला जातो पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणे कारवाई केली जात नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच या आंदोलकांना छुपा पाठींबा दिला जात असल्याचा आरोपही खंडागळे यांनी केला आहे. मी यापूर्वी अनेकदा हा विषय वेगवेगळ््या व्यासपीठावर मांडला. मात्र कोण दखलच घेत नाही.