शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

वनजमिनींवरचा ‘कब्जा’ हटविणे हा भुलभुलैया

By admin | Updated: January 7, 2017 01:14 IST

जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा नागरी वस्तीतील वाढत्या वावरामुळे वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात ही अतिक्रमणे हटविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापूर्वीही अशी अनेकदा आश्वासने देऊन कारवाई न झाल्याने हा भुलभुलैया सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश शासन देत आहे, मात्र मागील काही वर्षांपासून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वनजमिनींमध्ये लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केले आहे. येथील शेकडो हेक्टर क्षेत्रातील वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. या आंदोलकांना शासनाने मोकळ्या जमिनी नक्कीच द्याव्यात पण आंदोलकांकडून होत असलेली बेसुमार वृक्षतोड, तत्काळ थांबवावी. जिल्हाधिकारी, महसूलविभाग, वनविभाग, पालकमंत्री यांना निवेदन देऊनही वृक्षतोड थांबविण्याबाबत शासन व प्रशासन गप्प का..? असा सवाल खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जुन्नर, खेड, मावळ, भागातील बिबट्यांचा दौैंड, बारामती व इंदापूर या भागात प्रादुर्भाव वाढला आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात वनजमिनींवर लोकशासनच्या आंदोलकांनी अतिक्रमण केल्याचा मुद्दा दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाअखेरपर्यंत ही अतिक्रमणे हटविण्यात येतील असे आश्वासन या वेळी दिले होते.सन २०१३ पासून लोकशासनाने आंदोलक जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील ठिकठिकाणच्या वनजमिनींमध्ये ठाण मांडून बसले आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, येडगाव, कांदळी नगदवाडी, पिंपरीपेंढार, नेतवड आदी गावांमध्ये या आंदोलकांकडून वनजमिनींवर ताबा घालण्यात आला आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा पाईपलाईन नेण्यासाठी वनविभागाकडून २-२ वर्षे परवानगी दिली जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर परवानगीशिवाय पाईपलाईन नेली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. मग आता नष्ट होत असलेल्या वनसंपदेकडे शासन व प्रशासन डोळेझाक का करत आहे.(वार्ताहर)>आंदोलकांची दहशतवनजमिनीत हे आंदोलक वास्तव्य करीत आहेत. त्यात भिल्ल, ठाकर, कातकरी आदी जमातीचे लोक आहेत. त्या परिसरात कोणी ग्रामस्थ किंंवा प्रशासकीय अधिकारी गेल्यास ते दगड, भाले, गोफणीतून हल्ला करीत असल्याने तेथे कोणी जात नाही. त्यांची या परिसरात दहशत असल्याचे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले.या आंदोलकांनी अनेक ठिकाणी वृक्षतोड करून नांगरणी करून प्लॉट तयार केले आहेत. वीज चोरून वापरली जात आहे. वीज वितरणकडून देखील कोणतीच कारवाई केली जात नाही.ग्रामस्थांनी ज्या वनांचे मोठ्या आस्थेने संरक्षण केले आहे तीच वने आता डोळ्यांसमोर नष्ट होऊ लागली आहे. त्यातच बिबट्यांचा रहिवासही नष्ट होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातो़वन विभागाकडून फक्त कारवाईचा फार्स केला जातो पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणे कारवाई केली जात नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच या आंदोलकांना छुपा पाठींबा दिला जात असल्याचा आरोपही खंडागळे यांनी केला आहे. मी यापूर्वी अनेकदा हा विषय वेगवेगळ््या व्यासपीठावर मांडला. मात्र कोण दखलच घेत नाही.