शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटविणे हाच एक पर्याय नाही

By admin | Updated: June 6, 2016 03:14 IST

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात यावे, ही देशातील अनेक संघटना व संस्थांची अपेक्षा आहे. परंतु केवळ कलम ३७० हटविणे हा एकच पर्याय नाही.

योगेश पांडे ,  नागपूरजम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात यावे, ही देशातील अनेक संघटना व संस्थांची अपेक्षा आहे. परंतु केवळ कलम ३७० हटविणे हा एकच पर्याय नाही. संविधानात सुधारणा घडवून कलमातील अटी शिथीलदेखील करता येऊ शकतात. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुद्यावर देशपातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पार्टीच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कलम ३७०चा विषय निघताच गोंधळ सुरू होतो. हा केवळ काश्मीरच नव्हे तर देशाशी जुळलेला मुद्दा आहे. तेथे व्यापार करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांशीदेखील त्याचा संबंध आहे. कलम ३७० हटले तर कुठल्याही राज्यातील व्यापारी तेथे जाऊन व्यापार करूशकेल. यात काश्मिरी जनतेचादेखील फायदाच होणार आहे.कलम ३७० हटविण्याबाबत काश्मिरी जनतेसोबतच संपूर्ण देशाचे मत लक्षात घ्यायला हवे. केंद्र सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कलम ३७० हटेल की नाही याबाबत भाष्य करता येणे शक्यनाही. परंतु यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत, असे चारी यांनी स्पष्ट केले.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या मुद्यावर केंद्र गंभीर असून मंत्रालयीन पातळीवर विविध आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतु त्यांची आताच वाच्यता करणे योग्य होणार नाही, असेदेखील ते म्हणाले.