शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

समूह विकासावरील स्थगिती हटवा

By admin | Updated: June 6, 2017 05:53 IST

मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास न करताच राज्यातील मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती. परंतु, नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या अखत्यारित येणाऱ्या विभागाचा अभ्यास करून याठिकाणी समूह विकास केला जाऊ शकतो, असे म्हणत राज्य सरकारने नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर यांसारख्या शहरांमध्ये समूह विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. समूह विकास करणाऱ्या खासगी विकासकाला चार एफएसआय देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला ठाण्याचे रहिवासी दत्तात्रय दौंड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या योजनेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा व या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणाचाही सरकारने अभ्यास केला नाही. त्यामुळे सरकारला आधी अभ्यास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती दौड यांनी याचिकेत केली आहे.याचिकाकर्त्याची विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१४ मध्ये समूह विकासाला स्थगिती दिली. राज्य सरकारला याबाबत अंतिम निर्णय न घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. त्यावर तब्बल दोन वर्षांनी नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, असे सांगत अर्जानुसार, नवी मुंबई व सिडकोने अभ्यास करून नवी मुंबईचा समूह विकास करणे शक्य आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येणार नाही. नवी मुंबई व सिडको याबाबत योग्य व्यवस्थापन करेल. त्यामुळे नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवावी, असे राज्य सरकारने सांगितले. उच्च न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.