शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

समूह विकासावरील स्थगिती हटवा

By admin | Updated: June 6, 2017 05:53 IST

मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास न करताच राज्यातील मोठ्या शहरांचा समूह विकास करण्याबाबत धोरण मंजूर केल्याने उच्च न्यायालयाने या धोरणाला २०१४ मध्ये स्थगिती दिली होती. परंतु, नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या अखत्यारित येणाऱ्या विभागाचा अभ्यास करून याठिकाणी समूह विकास केला जाऊ शकतो, असे म्हणत राज्य सरकारने नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर यांसारख्या शहरांमध्ये समूह विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. समूह विकास करणाऱ्या खासगी विकासकाला चार एफएसआय देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला ठाण्याचे रहिवासी दत्तात्रय दौंड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या योजनेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा व या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणाचाही सरकारने अभ्यास केला नाही. त्यामुळे सरकारला आधी अभ्यास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती दौड यांनी याचिकेत केली आहे.याचिकाकर्त्याची विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१४ मध्ये समूह विकासाला स्थगिती दिली. राज्य सरकारला याबाबत अंतिम निर्णय न घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. त्यावर तब्बल दोन वर्षांनी नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, असे सांगत अर्जानुसार, नवी मुंबई व सिडकोने अभ्यास करून नवी मुंबईचा समूह विकास करणे शक्य आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येणार नाही. नवी मुंबई व सिडको याबाबत योग्य व्यवस्थापन करेल. त्यामुळे नवी मुंबईच्या समूह विकासावरील स्थगिती हटवावी, असे राज्य सरकारने सांगितले. उच्च न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.